‘अदानी नको, पण ममदानी–मुलतानी चालतात?’ ठाकरे बंधूंवर नितेश राणेंचा घणाघात

मुंबई : राज आणि उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. उद्योगपती अदानींवर सातत्याने टीका करणाऱ्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नितेश राणेंनी सोशल मीडियावर एक ट्विट केले असून, ते सध्या राजकीय वर्तुळात महत्वाचा विषय ठरला आहे.


नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये ठाकरे बंधूंच्या धोरणांवर बोट ठेवत, “अदानी चालत नाही, पण ममदानी आणि मुलतानी चालतात?” असा सवाल उपस्थित केला आहे. या एका ओळीमुळे ठाकरे गटाची उद्योग, गुंतवणूक आणि विकासाबाबतची भूमिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.



कालच्या भाषणावरून थेट पलटवार


राज आणि उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत उद्योगसमूह, मुंबईतील प्रकल्प आणि भांडवलदारांवर टीकेची धार लावली होती. याच भाषणाचा संदर्भ घेत नितेश राणेंनी ठाकरे गटावर दुहेरी निकष लावण्याचा आरोप केला आहे. विकासाच्या नावाखाली काही उद्योगपतींना विरोध आणि काहींना मूकसंमती, अशी भूमिका ठाकरे गट घेत असल्याचा दावा त्यांनी केला.





‘विकासाला विरोध म्हणजे मुंबईचं नुकसान’


“मुंबईचा विकास रोखून धरायचा आणि मग भावनिक मुद्द्यांवर मतं मागायची,” अशी ठाकरे गटाची भूमिका आहे. नितेश राणे यांच्या मते, मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज असताना केवळ राजकीय भूमिकेपोटी उद्योगांना विरोध करणे हे राज्याच्या हिताचे नाही. “जेव्हा राज्यात गुंतवणूक येते, रोजगारनिर्मिती होते, तेव्हा त्याला विरोध का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.



सोशल मीडियावर प्रतिक्रिया, ठाकरे गट अडचणीत


नितेश राणेंचं हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप समर्थकांकडून या ट्विटचं समर्थन केलं जात असून, ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर ठाकरे गटाकडे या प्रश्नाचे उत्तरच नसल्याने ते मुकगिळून बसावे लागत आहे.


दरम्यान, नितेश राणेंच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून, BMC निवडणुकीच्या तोंडावर आरोप–प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.

Comments
Add Comment

Ajit Pawar: अजित पवार शेवटी फोनवर काय बोलले, बारामतीतून मोठी माहिती समोर येणार

बारामती : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला

रानडे मार्गावर ठेच लागून ज्येष्ठ नागरिकावर जखमी होण्याची आली वेळ, कुटुंबाने महापालिकेकडे ही मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ आणि खोदलेले रस्ते पुन्हा योग्यप्रकारे न बनवल्यास ते असमांतर बनवून

मध्यप्रदेशच्या तरुणांनी महापालिकेच्या वाहनतळाचा घेतला ताबा... महापालिकेने उचलले हे पाऊल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हुतात्मा चौक येथील वाहनतळाच्याठिकाणी महापालिकेच्यावतीने निशुल्क सेवा दिली जात

मुंबई विमानतळावर विमानांचा मोठा अपघात टळला

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठी बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

स्वच्छ सर्वेक्षण २०२६; शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेच्या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हा, नागरिकांना मुंबई मनपाचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यंदाच्या

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार