उबाठा आणि काँग्रेसला मुंबई महापालिका कळलीच नाही!

२५ वर्षं सत्ता आणि विरोधी पक्षांत राहून दिली कामांची फक्त आश्वासने


मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्यावतीने जाहीर करण्यात येणारा वचननामा हा महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्याकामांच्या संदर्भात असणे स्वाभाविक मानले जाते; परंतु २५ वर्षे महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या उबाठाला आणि २५ वर्षे विरोधी पक्षांत बसणाऱ्या काँग्रेस पक्षाला मुंबई महापालिकाच कळलेलीच नाही. मुंबई महापालिकेच्या अखत्यारित कोणतीह कामे येतात आणि कोणती कामे सरकारच्या अखत्यारित येतात याची माहितीच न झाल्याने दोन्ही पक्षांनी आपले वचननामे बनवतानाच महापालिकेशी तीळमात्र संबंध नसलेल्या कामांचा समावेश आपल्या वचननाम्यांमध्ये केल्याचे पाहायला मिळाले आहे.


आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उबाठा आणि मनसे तसेच काँग्रेस आणि वंचितने जाहीर केलेला वचननाम्यातील निम्मी आश्वासने ही महापालिकेच्या अखत्यारित येत नसून राज्य सरकारच्या अखत्यारितील दिसून येत आहे. त्यामुळे उबाठा आणि मनसे तसेच काँग्रेस आणि वंचित हे नक्की महापालिकेची निवडणूक लढवायला चालले आहेत का? की विधानसभेच्या निवडणुकीतून अजून बाहेरच पडलेले नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे. युती आणि आघाडीने जाहीर केलेल्या वचननाम्यांमध्ये महापालिकेच्यावतीने केल्या जाणाऱ्या कामांचा समावेश असणे स्वाभाविक मानले जाते . परंतु दोन्ही पक्षांनी मांडलेल्या वचननाम्यांमध्ये सरकारच्या मदतीशिवाय आणि परवानगीशिवाय न होणाऱ्या कामांचा तथा सरकारच्यावतीने निर्णयानुसार केल्या जाणाऱ्या कामांचा समावेश करण्यात आला आहे . त्यामुळे एकप्रकारे मुंबईकरांची महापालिकेच्या कामांशी संबंध नसतानाही केवळ गाजरे दाखवून फसवणू करण्याचे काम करण्याचा प्रयत्न युती आणि आघाडीकडून केले जात आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.




  • उबाठा आणि मनसेच्या वचननाम्यातील या आश्वासनांचाा महापालिकेशी काय संबंध?

  • घरकाम करणाऱ्या महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये स्वाभिमान निधी देणार.

  • कष्टकरी मुंबईकरांसाठी दहा रुपयांत नाश्ता आणि दुपारचं जेवण देणारी माँसाहेब किचन्स सुरू करणार.

  • १ लाख तरुण तरुणींना प्रत्येकी २५ हजार ते १ लाख रुपयांचा स्वयंरोजगार सहाय्यता निधी देणार.

  • २५ हजार गिग वर्कर्सना आणि डबेवाल्यांना ई-बाईकसाठी बिनव्याजी कर्ज देणार.

  • महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डात यूपीएससी आणि एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी सी.डी. देशमुख प्रशिक्षण केंद्र सुरु करणार.

  • दहावीनंतरची गळती रोखण्यासाठी महापालिका शाळा इमारतीत बारावीपर्यंतचे ज्युनिअर कॉलेज सुरू करणार.

  • मुंबई महापालिकेच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देशातील ग्रंथालय उभारलं जाईल.


काँग्रेस आणि वंचितचा जाहीरनाम्याचा पालिकेशी काय संबंध?




  •  नवीन, आधुनिक बाजारपेठांची उभारणी करणार

  •  क्लस्टर पुनर्विकासासाठी ४ हजार चौरस मीटर ऐवजी ३ हजारचा पर्याय देणार

  •  कोळीवाडा व गावठाणांसाठी विशेष विकास धोरण आखणार

  •  मुंबईत अधिक अंगणवाड्या सुरू करणार

  •  औद्योगिक व व्यावसायिक धूर नियंत्रण करणार

Comments
Add Comment

फुलांची होळी उपक्रमातून महापौर रितू तावडे यांनी दिला पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश

मुंबई : होळी व धुळवड/रंगपंचमी हे सण आनंदात साजरे करावेत आणि त्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे सामाजिक

दोन महिन्यांत राज्यातील सव्वा कोटी नागरिकांची आरोग्य तपासणी

आरोग्य जागर : सिकलसेलपासून कर्करोगापर्यंतच्या मोहिमांना मोठे यश मुंबई : राज्यातील जनतेचे आरोग्य सुदृढ

राज्यातील अकुशल कामगारांच्या थकीत मजुरीचा प्रश्न सुटला

मनरेगा अंतर्गत १ हजार १६८ कोटींचा निधी मंजूर; होळीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा श्रमिकांना मोठा दिलासा मुंबई :

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था

मुंबई : इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह

आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना आणि मदतीसाठीचे हेल्पलाईन आणि व्हॉटसॲप क्रमांक

मुंबई : मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या