मकरसंक्रांत साजरी करू नका, नाही तर परिणाम भोगा!

बांगलादेशात हिंदूंना धमकी, जमात-ए-इस्लामीचा इशारा


ढाका : बांगलादेश निवडणुकांच्या दिशेने वाटचाल करत असताना देशात धार्मिक अल्पसंख्याकांवरील, विशेषतः हिंदू समाजावरील हिंसाचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर कट्टरपंथी संघटना जमात-ए-इस्लामीने मकर संक्रांती (स्थानिक भाषेत ‘शकरैन’) साजरी न करण्याचा इशारा दिला आहे.


जमात-ए-इस्लामीने सोशल मीडियावर आणि स्थानिक घोषणांद्वारे हिंदूंना धमकी देत, शकरैनच्या काळात संगीत वाजवणे, पतंग उडवणे किंवा कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केल्यास “कठोर परिणाम भोगावे लागतील,” असे स्पष्ट केले आहे. या इशाऱ्यामुळे ढाका, चितगाव, सिल्हेटसह अनेक हिंदूबहुल भागांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कुटुंबांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव हा सण घरातच किंवा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षी १४ जानेवारी रोजी शकरैन मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र अलीकडच्या काळात काही कट्टर गटांनी या सणाला “गैर-इस्लामी” ठरवत विरोध सुरू केला आहे. गेल्या वर्षी ढाका व चितगावमध्ये उत्सव साजरा करणाऱ्यांवर हल्ल्यांच्या घटना घडल्या होत्या.


डिसेंबर २०२५ मध्ये विद्यार्थी नेता उस्मान हादी यांच्या हत्येनंतर परिस्थिती अधिकच चिघळली. त्यानंतर हिंदूंवर हल्ले, हत्या आणि लिंचिंगच्या घटना वाढल्या. बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिलनुसार, केवळ डिसेंबरमध्येच जातीय हिंसाचाराच्या किमान ५१ घटना नोंदल्या गेल्या आहेत. यामध्ये खून, जाळपोळ, दरोडे, खोट्या ईशनिंदेच्या आरोपांखाली अटक यांचा समावेश आहे. या वाढत्या हिंसाचारामुळे मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

इराणमधील हिंसक आंदोलनात आतापर्यंत ५ हजार जणांचा मृत्यू

तेहरान(वृत्तसंस्था): इराणमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांमुळे आतापर्यंत किमान पाच हजार जणांचा मृत्यू झाला

महाराष्ट्र राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी दुमदुमली झ्युरिकची भूमी...

महापालिका निवडणुकीतील यशाबद्दल ठिकठिकाणी अभिनंदन झ्युरिक :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे वर्ल्ड इकोनॉमिक

भारताचा पाकिस्तानवर 'फार्मा' स्ट्राइक!

अफगाणिस्तानमध्ये भारतीय औषधांचा दबदबा काबुल : अफगाणिस्तानच्या फार्मा बाजारात सध्या मोठा बदल पाहायला मिळत आहे.

भारताच्या मदतीने श्रीलंकेत तिसरा बेली ब्रिज पूर्ण

कँडी - नुवारा एलिया मार्ग खुला कोलंबो : श्रीलंकेत आलेल्या ‘दित्वाह’ वादळानंतर भारत सरकारकडून राबवण्यात येत

थायलंडमधील रेल्वेवर क्रेन कोसळल्याने २२ जणांचा मृत्यू

बँकॉक : थायलंडमध्ये एक अतिशय भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे. थायलंडच्या ईशान्य प्रांतात एक अवजड क्रेन रेल्वेवर

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन