Devendra Fadnavis: “दोन भाऊ येऊन गेले, पण त्यांना श्रीरामाची आठवणही झाली नाही”

नाशिक : निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकच्या सभेतून उद्धव आणि राज यांच्यावर जोरदार टीका केली. “मी श्रीराम प्रभूंना वंदन करतोय. मात्र काल-परवा दोन भाऊ नाशिकमध्ये येऊन गेले, पण त्यांना रामाची आठवणच झाली नाही. नाशिकमध्ये येऊन ज्यांनी राम मांडला नाही, त्यांच्या मनात आता राम उरलेला नाही. जो रामाचा नाही, तो कोणत्याही कामाचा नाही,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली. ते नाशिकमधील प्रचारसभेत बोलत होते.

“अलीकडच्या काळात काही लोक देव आहेत की नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत आहेत. काही जण देवाची खिल्ली उडवत आहेत. त्यांच्याबद्दल मी फार काही बोलणार नाही. मात्र नाशिकचा खरा विकास झाला असेल आणि पुढे होणार असेल, तर तो करण्याची क्षमता केवळ भारतीय जनता पक्षात आहे,” असे फडणवीस म्हणाले. नाशिक ‘दत्तक’ घेतल्याच्या वक्तव्यावरून होत असलेल्या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. “माझी खिल्ली उडवली गेली की नाशिक दत्तक घेतलं, त्याचं काय झालं? मी 2017 आणि 2019 मध्ये विरोधी पक्षनेता होतो. फक्त दोन वर्ष माझ्याकडे होती, तरी मी कधी तक्रार केली नाही. आम्ही तक्रार करणारे लोक नाही,” असे ते म्हणाले.

कोविड काळाचा उल्लेख करत फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “कोविडच्या काळात उबाठा, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते घरी बसले होते. त्या काळात देवाभाऊ नाशिकमध्ये होते. कोविड केअर सेंटरपासून आयसीयूपर्यंत ते फिरत होते. पण निवडणुका आल्या की नाशिकला येणारे आणि संपल्या की विसरणारे हे निवडणूक पर्यटक आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
Comments
Add Comment

Belgium national football team : बेल्जियमचा वर्ल्ड कप संघ जाहीर, केविन डी. ब्रुयनला कर्णधारपद, ओपेंडा संघातून बाहेर

आगामी फिफा वर्ल्डकप २०२६ साठी (FIFA WORLD CUP 2026) बेल्जियम फुटबॉल फेडरेशनने २६ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. यावेळी

Ranbir Kapoor : रणबीर कपूर झाला अयोध्यावासी! ‘रामायण’ रिलीजआधी राम मंदिराजवळ ३.३१ कोटींची प्रॉपर्टी खरेदी

अयोध्या : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या बहुचर्चित रामायण (Ramayana) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो प्रभू

Rachin Ravindra : केकेआरला मोठा धक्का ! एकही सामना न खेळता स्टार खेळाडू हंगामातून बाहेर

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये केकेआरने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. या हंगामात ११ पैकी चार सामने जिंकत ९ गुण मिळवले

IPL 2026 : प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईच्या संघात कुलदीप यादवची एन्ट्री तर RCB मध्येही मोठा बदल

चेन्नई : आयपीएलच्या १९ व्या हंगामात प्लेऑफमध्ये कोणते संघ पोहोचणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

New Jail In Mumbai : मुंबईत मानखुर्द परिसरात ११ एकर भूखंडावर उभारणार नवे कारागृह

मुंबई : राज्यातील कारागृहांवरील वाढता ताण आणि कैद्यांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द

France Football : फ्रान्सचा वर्ल्ड कप संघ जाहीर; कीलीयन मबंप्पेला कर्णधारपद ,कोलो मुआनी संघाबाहेर

पॅरिस : आगामी 2026 FIFA World Cup साठी फ्रान्सने २६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. २०२२ च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध