Devendra Fadnavis: “दोन भाऊ येऊन गेले, पण त्यांना श्रीरामाची आठवणही झाली नाही”

नाशिक : निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकच्या सभेतून उद्धव आणि राज यांच्यावर जोरदार टीका केली. “मी श्रीराम प्रभूंना वंदन करतोय. मात्र काल-परवा दोन भाऊ नाशिकमध्ये येऊन गेले, पण त्यांना रामाची आठवणच झाली नाही. नाशिकमध्ये येऊन ज्यांनी राम मांडला नाही, त्यांच्या मनात आता राम उरलेला नाही. जो रामाचा नाही, तो कोणत्याही कामाचा नाही,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली. ते नाशिकमधील प्रचारसभेत बोलत होते.

“अलीकडच्या काळात काही लोक देव आहेत की नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत आहेत. काही जण देवाची खिल्ली उडवत आहेत. त्यांच्याबद्दल मी फार काही बोलणार नाही. मात्र नाशिकचा खरा विकास झाला असेल आणि पुढे होणार असेल, तर तो करण्याची क्षमता केवळ भारतीय जनता पक्षात आहे,” असे फडणवीस म्हणाले. नाशिक ‘दत्तक’ घेतल्याच्या वक्तव्यावरून होत असलेल्या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. “माझी खिल्ली उडवली गेली की नाशिक दत्तक घेतलं, त्याचं काय झालं? मी 2017 आणि 2019 मध्ये विरोधी पक्षनेता होतो. फक्त दोन वर्ष माझ्याकडे होती, तरी मी कधी तक्रार केली नाही. आम्ही तक्रार करणारे लोक नाही,” असे ते म्हणाले.

कोविड काळाचा उल्लेख करत फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “कोविडच्या काळात उबाठा, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते घरी बसले होते. त्या काळात देवाभाऊ नाशिकमध्ये होते. कोविड केअर सेंटरपासून आयसीयूपर्यंत ते फिरत होते. पण निवडणुका आल्या की नाशिकला येणारे आणि संपल्या की विसरणारे हे निवडणूक पर्यटक आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
Comments
Add Comment

Nashik : आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीय, नाशिक–पुणे रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा एल्गार

नाशिक : नाशिक–पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा नव्हे, तर नाशिकच्या विकासाचा आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीचा

Nashik : नाशिक जिल्ह्यात 1,148 विद्यार्थ्यांकडून 26 हजार 891 वारकऱ्यांची चरणसेवा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा उपक्रम

Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत

Casting couch : इंडस्ट्रीमध्ये आधी शारीरिक सुखाची मागणी व्हायची आता, थेट…, अभिनेत्रीने सर्वच सांगून टाकलं

Casting couch : फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियर करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मेहनतीच्या जोरावर अनेक जण हे शिखर गाठतातही. पण

Skincare tips for monsoon : पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या सोपे उपाय

पावसाळ्यात त्वचा निस्तेज होतेय? या ८ सोप्या टिप्स फॉलो करा आणि त्वचा ठेवा निरोगी व चमकदार (Skincare tips for monsoon)   चेहरा

आमिर खानच्या तिसऱ्या पत्नीचा पहिला नवरा कोण ? तुम्हांला माहिती आहे का ? गौरी स्प्रॅटच्या एक्स हजबंडबद्दल जाणून घ्या

Gauri Spratt Ex-Husband : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक

Healthy Food for Rainy Season : पावसाळ्यात 'हे' हेल्दी आणि टेस्टी पदार्थ नक्की ट्राय करा; चवही मिळेल आणि आरोग्यही राहील उत्तम!

मुंबई: पावसाळा म्हटलं की गरमागरम भजी, वडे, समोसे आणि चहाचा कप अशीच अनेकांच्या मनातली पहिली इच्छा असते. मात्र, या