लुटनिक यांच्या दाव्यात तथ्यता नाही मोदींनी ट्रम्प यांच्याशी ७ ते ८ वेळा संवाद साधला- रणधीर जैसवाल

प्रतिनिधी: एकीकडे भारत व युएस यांच्यातील संबंधावर मोठा दावा युएस वाणिज्य विभागाचे सचिव हावर्ड लुटनिक यांनी केल्यानंतर त्यांचा संपूर्ण दावा काल पत्रकार परिषदेत भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैसवाल यांनी खोडून काढला. आम्ही असहमत असून संपूर्ण दावा नाकारत असून यामध्ये तथ्य नसल्याचे जैसवाल यांनी स्पष्ट केले. हावर्ड लुटनिक यांनी एका पोडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी संवाद साधण्याचे टाळले असल्याचे म्हटले होते.यावर भाष्य करताना, किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२५ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पीएम मोदी यांनी ७ ते ८ वेळा फोनवर संवाद साधला असल्याचे जैसवाल म्हणाले आहेत.


दोन्ही देशांना फायदेशीर ठरेल असा व्यापारी करार करण्याची भारताची भूमिका आहे. भारताच्या बाजूनेही गेल्या फेब्रुवारीपासून अनेक वेळा चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे हा लुटनिक यांचा दावा चुकीचा आहे. भारतानेही अनेकदा सामंजस्याची भूमिका घेत बोलणी केली होती. त्यामुळे अनेकदा हा व्यापारी करार पूर्ण होईल अशी आशा निर्माण झाली होती. अद्याप यावर तोडगा निघाला नसला तरी युएसकडून केलेल्या गेलेल्या दाव्यात तथ्यता नाही. दरम्यान लुटनिक यांनी एका पोडकास्ट कार्यक्रमात ट्रम्प यांना कराराबाबत मोदीशी संवाद साधायचा होता परंतु मोदींनी संवाद साधला नाही. मोदी फोन करण्यात व उचलण्यास उत्सुक नव्हते असा धक्कादायक दावा लुटनिक यांनी केला होता. यापूर्वी या आठवड्याच्या सुरुवातीला लिंडसे ग्रॅहम यांनी सोशल मिडिया अकाऊंटवरून भारतावर ५००% टॅरिफ लावण्याचे सूचित केले होते. जाणकारांच्या मते डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत व पाकिस्तानातील युद्ध माझ्या सांगण्यावरून थांबले या दाव्यांंनंतर दोन्ही देशातील कटुता आणखी वाढली असल्याचे सांगितले जाते.

Comments
Add Comment

Nashik Kumbhmela : १००८ खालसांना सुविधा द्या, शाही स्नान मार्ग रुंद करा- महंत संजय दास यांची मागणी

Nashik Kumbhmela : आखाड्यांसाठी आवश्यक जमीन जवळच्या परिसरात उपलब्ध करून द्यावी, शाही स्नानाच्या मार्गाचे रुंदीकरण करून

Spain vs Argentina : अंतिम सामन्यांनंतर अर्जंटिनाला मोठा धक्का ! फिफाकडून खेळाडूंवर कारवाईची शक्यता; नेमकं प्रकरण काय ?

मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेनने १-० ने अर्जेंटिनाचा पराभव केला होता. अंतिम सामन्यांनंतर

Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले 'हे' ५ महत्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत

Sikkim Landslide PM Modi : समरदुंग बोगदा अपघात प्रकरणी पंतप्रधानांनी साधला सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सिक्कीममधील नामची जिल्ह्यातील झोलुंगे अंतर्गत समरदुंग येथे

FIFA WORLDCUP 2026 : स्पेनचा विश्वचषक विजेता संघ मायदेशी परतला; माद्रिदमध्ये २० लाख लोकांकडून ऐतिहासिक आणि शाही स्वागत

माद्रिद: न्यू जर्सी येथे पार पडलेल्या रोमांचक अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा १-० अशा गोलने पराभव करत विश्वचषक

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,