'ठाकरेंचा बालेकिल्ला ? याच भागातून आमचे उमेदवार तीन वेळा मोठ्या मताधिक्याने विजयी'



मुंबई : वरळी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. भाजपचे आक्रमक नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी वरळीत प्रचारसभेत बोलताना आदित्य ठाकरे आणि उबाठा गटावर तिखट शब्दांत टीका केली. "हा ठाकरेंचा बालेकिल्ला आहे असे म्हणण्याची आता गरज उरलेली नाही, कारण आम्हीही तीन-तीन वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून येतो," असे म्हणत त्यांनी सुरुवातीलाच आव्हान दिले.

बीडीडी चाळ आणि विकासाचा मुद्दा


वरळीतील कळीचा मुद्दा असलेल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासावरून राणेंनी आदित्य ठाकरेंना घेरले. "वडील मुख्यमंत्री होते आणि मुलगा मंत्री, तरीही बीडीडी चाळीत राहणाऱ्या मराठी माणसाला न्याय मिळाला नाही. हा प्रश्न सोडवण्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत," असा आरोप त्यांनी केला. तसेच, बीडीडी चाळीच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

हिंदुत्व आणि 'हिरवे साप'


बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा संदर्भ देत नितेश राणे म्हणाले की, "बाळासाहेबांनी कधीच हिंदुत्वाशी तडजोड केली नाही, म्हणूनच मुंबईतील मराठी माणूस दंगलीत वाचला. मात्र, आज त्यांच्या पक्षात बॉम्बस्फोटाच्या आरोपींना आणि 'हिरव्या सापांना' प्रवेश दिला जात आहे. जर आज बाळासाहेब असते, तर त्यांनी अशा लोकांना ढुंगणावर लाथ मारून बाहेर काढले असते."

अमित आणि आदित्य यांच्यावर टीका


अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकीवर भाष्य करताना राणे म्हणाले की, "आम्ही एकत्र आलो नाही तर हे दोन्ही भाऊ बेरोजगार होतील, या भीतीनेच ते एकत्र आले आहेत." तसेच, मुंबईतील मराठी माणसाचा टक्का घसरण्याला सध्याची सत्ताधारी यंत्रणा जबाबदार असल्याचे त्यांनी नमूद केले.

अस्तित्वाची लढाई आणि थेट आव्हान


"ही निवडणूक केवळ मतांची नसून आपल्या अस्तित्वाची आहे. जर यांची सत्ता आली तर मुंबईतील मंदिरे सुरक्षित राहणार नाहीत," अशी भीती त्यांनी व्यक्त केली. भाषणाच्या शेवटी त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन केले. "आमचा उमेदवार निवडून आला तर विजयाचे फटाके वाजवायला मी स्वतः येणार आणि एक फटाक्याची माळ 'मातोश्री' (कलानगर) समोरही लावणार," असे थेट आव्हान त्यांनी दिले.

Comments
Add Comment

Team India Schedule : विश्वचषकाच्या विजयानंतर पुढील कामगिरीसाठी भारतीय संघ सज्ज

- जाणून घ्या भारतीय संघाचे नवीन व्यस्त वेळापत्रक २०२६ चा आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक जिंकत भारतीय संघाने जागतिक

ICC Men's T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकामुळे आयसीसीची कोट्यवधींची कमाई

मुंबई : ICC Men's T20 World Cup २०२६ स्पर्धा केवळ क्रिकेटप्रेमींसाठीच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही मोठी ठरली आहे. या स्पर्धेतून

इराणचा दुबईमध्ये पुन्हा एकदा ड्रोन हल्ला; दुबईच्या अधिकाऱ्यांकडून तातडीची कारवाई

संयुक्त अरब अमिरातीतील दुबई येथे ड्रोन हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. दुबई प्रशासनाने गुरुवारी या

गॅस संकटाच्या नावाखाली संजय राऊतांचे घबराट निर्माण करण्याचे हीन राजकारण; नवनाथ बन यांचा प्रहार

मुंबई : इराण इस्राईल युद्धाचा फटका जगातील बहुतांश देशांना बसत आहे. मात्र अशा परिस्थितीतही भारत सुरक्षित

मॅच फिक्सिंग प्रकरणात ICC ची मोठी कारवाई; वेस्ट इंडिजचा खेळाडू आणि दोन संघ अधिकाऱ्यांवर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बंदी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने मॅच फिक्सिंग आणि गैरवर्तनाच्या आरोपांप्रकरणी कठोर कारवाई करत वेस्ट इंडिजचा

पुरावे द्या, गैरकारभार करणाऱ्या मासेमारी संस्थांवर कारवाई करू

मुंबई : "मत्स्यव्यवसाय करणाऱ्या संस्थांमध्ये गैरप्रकार होत असल्याची तक्रार असेल, तर पुरावे द्या, संबंधित