मागच्या वर्षांच्या तुलनेत या वर्षींच्या विमानसेवेत झाले एवढी वाढ ?

मुंबई : विमा वाहतुकीबाबतच्या ताज्या अहवालानुसार मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वर्षभरात म्हणजेच २०२५ मध्ये एकूण ३ लाख ३१ हजार ११ विमानांची वाहतूक झाली. यात ९२ हजार १४१ आंतरराष्ट्रीय आणि २ लाख ३८ हजार ८७० देशांतर्गत विमानं होती. या विमानांद्वारे वर्षभरात ५ कोटी ५५ लाख प्रवाशांची वाहतूक झाली. प्रवासी संख्येत २०२४ च्या तुलनेत १.३ टक्क्यांची तर विमान वाहतुकीत २०२२ च्या तुलनेत जवळपास २५ टक्क्यांची वाहतूक झाली आहे.


मुंबईतून प्रामुख्याने दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, हैदराबाद, दुबई, अबुधाबी, लंडन हिथ्रो आणि सिंगापूर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विमान वाहतूक झाली. तसेच २०२५ मध्ये मुंबईतून अल्माटी, अम्मान, बाली (डेनपसार), कोपनहेगन, फुजैराह, क्राबी, मँचेस्टर, तिबिलिसी, आदमपूर, अमरावती, हिंडन, झारसुगुडा, पोरबंदर, सोलापूर या शहरांसाठी विमानसेवा सुरू झाली आहे.


मुंबईतून २०२५ मध्ये सर्वाधिक विमानं दिल्लीसाठी उडाली. नंतर बंगळुरू आणि गोव्यासाठी मुंबईतून मोठ्या संख्येने उड्डाणे झाली. मुंबई - दिल्ली या विमान मार्गावरुन १७ टक्के प्रवासी वाहतूक झाली. मुंबई - दुबई या आंतरराष्ट्रीय विमान मार्गावर १५ टक्के प्रवासी वाहतूक झाली. आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीच्या बाबतीत मुंबई - दुबई या मार्गानंतर २८.२ टक्‍क्‍यांसह आशिया-पॅसिफिक आणि १४.५ टक्‍क्‍यांसह युरोपचा क्रमांक आहे. मुंबई विमानतळावरुन ये - जा करणाऱ्यांपैकी या सेवा आंतरराष्‍ट्रीय प्रवासी वाहतुकीमध्‍ये तर इंडिगो, एअर इंडिया आणि आकासा एअर या देशांतर्गत प्रवासी वाहतुकीत अव्वल आहेत.


मुंबईतून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये होत असलेल्या विमान वाहतुकीमुळे प्रवाशांची सोय झाली आहे. विविध शहरांमध्ये कमीत कमी वेळात पोहोचण्यासाठी प्रवासी मुंबईतून विमान प्रवासाचा पर्याय आनंदाने निवडत आहेत.

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास