एपीएमसी मार्केटजवळील चेक पोस्टवर आचारसंहिता पथकाने पकडली 16 लाख 16 हजार रोकड

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात प्रवेशाच्या तसेच मुख्य विविध 9 ठिकाणी दिवसाच्या तिन्ही सत्रांमध्ये 24 तासात 27 स्थिर संनिरीक्षण पथके (SST Team) स्थापन केलेली आहेत. या पथकांमार्फत वाहने व इतर बाबींवर काटेकोर लक्ष ठेवण्यात येत आहे.

महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार, आचारसंहिता कक्षाचे मुख्य सनियंत्रण अधिकारी श्री. सुनील पवार यांचे मार्गदर्शनाखाली, दि. 9 जानेवारी रोजी, दुपारी 12.30 वा. दरम्यान एपीएमसी मार्केट जवळील चेक पोस्टवर आचार संहिता कक्षाचे नोडल अधिकारी उपआयुक्त डॉ.अमोल पालवे व परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी श्री.तुषार दौंडकर तसेच प्रशासकीय अधिकारी श्री.संजीव पवार यांच्या नियंत्रणाखाली एकूण रू. १६,१६,०००/ - इतक्या किंमतीची रोकड पकडण्यात आली आहे. याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.
Comments
Add Comment

'Deool Band-2' Movie : ‘देऊळ बंद २’चा महाराष्ट्रभर धुमाकूळ! पहिल्याच दिवशी शो हाऊसफुल

मुंबई : महाराष्ट्रभर ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा गजर घुमवत बहुचर्चित मराठी चित्रपट ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा

Davkhare : गावदेवी भाजी मंडई आग दुर्घटनेप्रकरणी दुर्घटनाग्रस्तांना नुकसानभरपाई द्या, आमदार डावखरेंची मागणी

Thane : ठाण्यातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गजबजलेल्या गावदेवी भाजी मंडईमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून

Prasad Lad : प्रसाद लाड यांनी स्वीकारले जरांगे पाटील यांचे चर्चेचे निमंत्रण; उद्या आंतरवलीत भेट

मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार?; २३ मे च्या 'डेडलाईन'पूर्वी सरकारच्या वतीने मध्यस्थी मुंबई : मराठा आरक्षणाच्या

आता गावकऱ्यांना मिळणार मोफत मिळकत पत्रिका

सनद फी माफ करण्याची महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा; ग्रामविकास विभाग प्रस्ताव तयार करणार मुंबई : ग्रामपंचायत

वाई येथे लघुकुंभमेळ्याचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

वाईच्या लघुकुंभ मेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार:-जयकुमार गोरे सातारा वाई नगरीला “दक्षिण काशी” अशी ओळख

पक्षसंघटनेची एकजुटीने मजबूत बांधणी करणार

प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांचा निर्धार मुंबई; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व समज-गैरसमज दूर झाले आहेत.