कोल्हापुरात उडाली खळबळ! दोन नवविवाहितांची आत्महत्या, सासरच्या छळाला कंटाळून संपवले जीवन

कोल्हापूर: महाराष्ट्राच्या गाव खेड्यातून हुंडाबळी, छळ, यांसारख्या स्त्रियांवरील, नवविवाहितेवरील घटनांची मालिकाही वाढत चालली आहे. सासरी होणारे छळ, लाखोंचे हुंडे, किंवा वंशाच्या दिव्यासाठी नवविवाहितेवर सतत होणारे अत्याचार यांना कंटाळून अनेक महिलांनी आपले जीवन संपवले आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर आणि शिरोळ तालुक्यातून विवाहित महिलांच्या आत्महत्येच्या दोन संतापजनक घटना समोर आल्या असून, सासरकडील मानसिक व शारीरिक छळामुळेच या आत्महत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करत कारवाई सुरू केली आहे.



करवीर तालुक्यात नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या


करवीर तालुक्यातील कांडगाव येथे नवविवाहित प्रतीक्षा तुषार कांबळे हिने घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सततच्या त्रासाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.


या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात पती तुषार कांबळे आणि सासरे सारंग कांबळे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.



जयसिंगपूर-चिपरीत विवाहितेने पेट्रोल ओतून घेतला जीव


दुसरी घटना जयसिंगपूरजवळील चिपरी (ता. शिरोळ) येथून समोर आली आहे. येथे कोमल ऊर्फ कीर्ती किशोर आवळे (वय २७) हिने गुरुवारी रात्री अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली. गंभीर अवस्थेत तिला सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच मध्यरात्री तिचा मृत्यू झाला.


या आत्महत्येप्रकरणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. कीर्तीच्या लग्नाला बरीच वर्षे झाली तरी त्यांना बाळ नव्हते त्यामुळे सासरचे मंडळी नवऱ्याचे दुसरे लग्न लावून देऊ अश्या तिला धमक्या द्यायचे, सासरच्या मंडळी सतत तिच्यावर' जाच, तिचा छळ करत होते. त्यामुळे मानसिक न शारीरिक तणावातूनच कीर्तीने हे पाऊल उचलले आहे. असे तिच्या घरच्यांचे म्हणणे आहे.


या तक्रारीच्या आधारे जयसिंगपूर पोलिसांनी पती किशोर पट्टू आवळे, सासू शोभा आवळे, दीर अतुल आवळे आणि जाऊ कोमल अतुल आवळे (सर्व रा. चिपरी, ता. शिरोळ) यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत चौघांना अटक केली आहे.

Comments
Add Comment

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या