Vodafone Idea Update: सरकारने कंपनीचा एजीआर गोठवल्यानंतर वीआय शेअर्समध्ये ८% वाढ

मोहित सोमण: वोडाफोन आयडियासाठी मोठा दिलासा टेलिकॉम विभागाने (Department of Telecommunication DoT) दिला आहे. नव्या अपडेटनुसार विभागाने कंपनीची थकीत देय रक्कम असलेल्या एजीआरला त्वरीत चुकती न करवून घेता गोठवली (Freeze) केली आहे. त्यामुळे लगेचच कंपनीला ती रक्कम न देता टप्याटप्याने ही रक्कम विभागाला भरावी लागणार आहे. कंपनीने याविषयी एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला आता केवळ मार्च २०२६ ते मार्च २०३१ दरम्यान ११४ कोटी रुपये भरावे लागतील तर ते पूर्ण भरल्यावर मार्च २०३२ ते मार्च २०३५ कालावधीत उर्वरित १०० कोटी ४ वर्षात द्यावे लागतील असे कंपनीने म्हटले. त्यानंतर जी उर्वरित थकीत एजीआर (Average Gross Revenue AGR) मार्च २०३६ ते मार्च २०४१ कालावधीत भरावे लागतील असेही पुढे कंपनीने म्हटले आहे.


त्यामुळे ही रक्कम भरण्यासाठी टेलिकॉम विभागाने (DoT) समिती नेमली असून तिचा निर्णय याबाबत अंतिम राहील असे ठरलेले असल्याचेही कंपनीने यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे ही रक्कम ठरलेल्या मुदतीत सूचित केलेल्या हप्त्यात वेळेवर भरणे कंपनीवर बंधनकारक असणार आहे. यासह आर्थिक वर्ष २०१८ ते २०१९ कालावधीतील थकबाकी एजीआर ही २०२६ ते २०३१ कालावधीत टप्प्यात दिली जाणार आहे. हा वाद सरकार व कंपनी (VI) यांच्यात कायम असताना २७ ऑक्टोबर २०२५ रोजी व्हीआयने सरकार विरोधी याचिकेत दिलासा मिळवला होता कारण त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने हे थकित देयीसाठी सरकारने काही मार्ग काढावा असे सूचित केले होते. त्यानंतर सरकारने हे पाऊल उचलल्याने व्हीआयला मोठा दिलासा मिळाला आहे.


एकीकडे आर्थिक चणचणीत असताना कंपनी वाचवण्यासाठी सरकारने ४९% भागभांडवल कंपनीत खरेदी केले होते. दरम्यान कंपनीचे कामकाज वोडाफोन पीएलसी आणि आदित्य बिर्ला समुह यांच्या हातात पूर्ववतच राहिल असे सरकारने यावेळी म्हटले होते.१ जानेवारीला कंपनीला ६३८ कोटींची जीएसटी नोटीस मिळाल्यानंतर कंपनीला आणखी एका अडचणीला सामोरे जावे लागत होते. तत्पूर्वी कंपनीच्या कामकाजाला बळ मिळण्यासाठी प्रवर्तकांनी (Promoters) पुढील १२ महिन्यात २३०७ कोटींची गुंतवणूक खेळत्या भांडवलासाठी (Working Capital Requirments) करणार असल्याचे स्पष्ट केले होते. २०२० मध्ये सरकारने प्रलंबित निधी भरण्याचे आदेश देताना कंपनीची याचिका फेटाळली असली तरी पुढील १० वर्षात थकबाकी भरण्याची मूभा दिली होती. ३१ डिसेंबरला न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने हे तात्पुरते प्रमुख थकीत एजीआर २०३१ गोठवण्याचे ठरवले होते. त्यानंतर हा महत्वाचा निर्णय पुढे आला आहे.


आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत कंपनीचे एकूण देणी (Debt) २.०२ लाख कोटीहून अधिक आहे. वोडाफोन आयडिया यांच्या विलीनीकरणानंतर ८७००० कोटीचे एजीआर प्रलंबित होते. एजीआर हे सरकारला टेलिकॉम कंपन्यानी आपल्या सरासरी महसूलातील आधारे लायसन्स, व स्पेक्ट्रमसाठी आवश्यक असणारी फी भरणे असते. कंपनीच्या आजच्या नव्या माहितीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये आज ८% तुफान इंट्राडे वाढ झाली होती. दुपारी १२ वाजेपर्यंत मात्र कंपनीच्या शेअर्समध्ये ०.२६% किरकोळ घसरण झाली आहे. शेअरने आज ११.५२ रूपये प्रति शेअर हा उच्चांक नोंदवला आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) १.२४ लाख कोटी रुपये आहे. गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये २.६३% घसरण झाली असून महिन्यात शेअर्समध्ये ६.८०% वाढ झाली आहे. संपूर्ण वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ४४.८२% वाढ झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) शेअर्समध्ये ३.१३% घसरण झाली आहे.

Comments
Add Comment

'राष्ट्रवादीकडे असलेलं सर्वात मोठं पद सुनेत्रा पवारांनी स्वीकारावं'

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सध्या जे आहे त्यात राज्याचे उपमुख्यमंत्रिपद हे सर्वात मोठे पद आहे.

Mumbai Local Accident : शीव स्थानकाजवळ लोकलमधून ३ प्रवाशांचा तोल गेला अन् थेट रुळांवर फेकले गेले; २ जण गंभीर जखमी तर एक...

मुंबई : मुंबईच्या लोकल प्रवासातील जीवघेणी गर्दी पुन्हा एकदा प्रवाशांच्या मुळावर उठली आहे. शुक्रवारी सकाळी ऐन

Border 2 Box Office Collection Day 8 : सनी देओलचा जलवा कायम; ८ दिवसांत तब्बल 'इतक्या' कोटींचा टप्पा पार

मुंबई : सनी देओलच्या बहुप्रतिक्षित 'बॉर्डर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत ठेवली आहे. प्रजासत्ताक

Sharad Pawar : अजितदादांची 'ती' शेवटची इच्छा पूर्ण करणार; विलीनीकरणाचा निर्णय अंतिम टप्प्यात होता, पण...शरद पवार स्पष्टचं बोलले!

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अवघ्या ७२ तासांत महाराष्ट्राच्या राजकारणाने एक

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री…! कोण आहेत सुनेत्रा पवार?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर

Sunetra Pawar Oath : म्हणून सुनेत्रा पवारांबाबतचा निर्णय घाईघाईत घेण्यात आला; जाणून घ्या नेमकं काय घडलं

अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार