मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक सीओआरएस स्टेशन उभारणार

भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार


मुंबई : देशातील भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुंबई विद्यापीठ आणि भारतीय सर्वेक्षण विभाग (सर्व्हे ऑफ इंडिया) यांच्यात शैक्षणिक, संशोधन आणि तांत्रिक सहकार्य वाढविण्यासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. राष्ट्रीय भू-स्थानिक धोरण २०२२ अंमलबजावणीच्या अनुषंगाने या कराराचे महत्व अधोरेखित होणार असून, याअंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरात अत्याधुनिक सीओआरएस स्टेशन उभारण्यात येणार आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत उभारण्यात येणारे सीओआरएस स्टेशन मुंबईसह पश्चिम विभागासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. हे स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतर जीपीएस आधारित सर्वेक्षण, भू-मापन, मॅपिंग आणि स्थाननिर्धारण प्रक्रियेत अत्यंत उच्च अचूकता व विश्वासार्हता प्राप्त होणार आहे. शहरी नियोजन, स्मार्ट सिटी प्रकल्प, पायाभूत सुविधा विकास, बांधकाम क्षेत्र, वाहतूक व्यवस्थापन तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी या सेवांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे.


सीओआरएस स्टेशनमुळे सेंटीमीटर-स्तरावरील अचूक स्थानिक माहिती रिअल-टाइम स्वरूपात उपलब्ध होणार असून, याचा लाभ शासकीय विभाग, खासगी सर्वेक्षक, अभियंते, संशोधक आणि विद्यार्थ्यांना होणार आहे. विशेषतः भूगोल, जिओ-इन्फॉर्मेटिक्स, जीआयएस, रिमोट सेन्सिंग, संगणकीय अनुकूलन तसेच एआय/एमएल आधारित भू-स्थानिक संशोधनासाठी मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आणि आधुनिक तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळणार आहे. १७६७ साली स्थापन झालेला भारतीय सर्वेक्षण विभाग हा भारत सरकारचा सर्वात जुना वैज्ञानिक विभाग असून, देशासाठी अधिकृत व मूलभूत भू-स्थानिक माहिती उपलब्ध करून देण्याचे महत्वपूर्ण कार्ये विभागाच्या माध्यमातून केले जाते.


मुंबई विद्यापीठाची विस्तीर्ण भौगोलिक व्याप्ती, मोठी विद्यार्थी संख्या आणि सक्षम पायाभूत सुविधा लक्षात घेऊन भारतीय सर्वेक्षण विभागाने मुंबई विद्यापीठाची भागीदार संस्था म्हणून निवड केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या भूगोल विभागातील सर्व प्राध्यापकांच्या पुढाकारामुळे हा सामंजस्य करार झाला आहे.

Comments
Add Comment

लाडक्या बहिणींना धक्का; केवायसी न केलेल्या आणि नियमांचे उल्लंघन केलेल्या महिला योजनेतून बाद

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी महायुती सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'

Santosh Nalawade : वापरा आणि फेकून द्या...मनसेच्या शिवडी अध्यक्षांनी का दिला राजीनामा? ५ मोठी कारणं आली समोर

मनसेच्या वटवृक्षाला नेत्यांनीच टोचलं विषारी इंजेक्शन? मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले जात

खुशखबर! लोकल आणि मेल एक्सप्रेससाठी मिळणार स्वतंत्र मार्ग; मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून आदेश जारी...

मुंबई : मुंबईतील रेल्वेचे जाळे हे वेगानं वाढत चाललं आहेत. त्यामुळे अनेक शहरे मुंबईला जोडली जात आहे. मुंबई

Devendra Fadnavis On Raj Thackeray : राज ठाकरे इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील; फडणवीसांनी मांडलं पराभवाचं गणित, ठाकरेंच्या 'वारशा'वरही ओढले ताशेरे

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी चक्क त्यांच्या राजकीय

निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने गुरुवार, l १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान

वांद्र्यांतील रस्ते विकास महामंडळाच्या मुख्यालयावर फेब्रुवारीत हातोडा

पुनर्विकासातून ८ हजार कोटींचा महसूल अपेक्षित मुंबई : वांद्रे रेक्लेमेशन येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास