मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक सीओआरएस स्टेशन उभारणार

भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार


मुंबई : देशातील भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुंबई विद्यापीठ आणि भारतीय सर्वेक्षण विभाग (सर्व्हे ऑफ इंडिया) यांच्यात शैक्षणिक, संशोधन आणि तांत्रिक सहकार्य वाढविण्यासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. राष्ट्रीय भू-स्थानिक धोरण २०२२ अंमलबजावणीच्या अनुषंगाने या कराराचे महत्व अधोरेखित होणार असून, याअंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरात अत्याधुनिक सीओआरएस स्टेशन उभारण्यात येणार आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत उभारण्यात येणारे सीओआरएस स्टेशन मुंबईसह पश्चिम विभागासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. हे स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतर जीपीएस आधारित सर्वेक्षण, भू-मापन, मॅपिंग आणि स्थाननिर्धारण प्रक्रियेत अत्यंत उच्च अचूकता व विश्वासार्हता प्राप्त होणार आहे. शहरी नियोजन, स्मार्ट सिटी प्रकल्प, पायाभूत सुविधा विकास, बांधकाम क्षेत्र, वाहतूक व्यवस्थापन तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी या सेवांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे.


सीओआरएस स्टेशनमुळे सेंटीमीटर-स्तरावरील अचूक स्थानिक माहिती रिअल-टाइम स्वरूपात उपलब्ध होणार असून, याचा लाभ शासकीय विभाग, खासगी सर्वेक्षक, अभियंते, संशोधक आणि विद्यार्थ्यांना होणार आहे. विशेषतः भूगोल, जिओ-इन्फॉर्मेटिक्स, जीआयएस, रिमोट सेन्सिंग, संगणकीय अनुकूलन तसेच एआय/एमएल आधारित भू-स्थानिक संशोधनासाठी मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आणि आधुनिक तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळणार आहे. १७६७ साली स्थापन झालेला भारतीय सर्वेक्षण विभाग हा भारत सरकारचा सर्वात जुना वैज्ञानिक विभाग असून, देशासाठी अधिकृत व मूलभूत भू-स्थानिक माहिती उपलब्ध करून देण्याचे महत्वपूर्ण कार्ये विभागाच्या माध्यमातून केले जाते.


मुंबई विद्यापीठाची विस्तीर्ण भौगोलिक व्याप्ती, मोठी विद्यार्थी संख्या आणि सक्षम पायाभूत सुविधा लक्षात घेऊन भारतीय सर्वेक्षण विभागाने मुंबई विद्यापीठाची भागीदार संस्था म्हणून निवड केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या भूगोल विभागातील सर्व प्राध्यापकांच्या पुढाकारामुळे हा सामंजस्य करार झाला आहे.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?

राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान

कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व