बोटावरची शाई दाखवा अन् सवलतींचा लाभ घ्या

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पालिकेची मोहीम


विरार : वसई-विरार महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी महापालिकेने मतदारांमध्ये जनजागृती मोहीम सुरू केली आहे. तसेच मतदार करणाऱ्या मतदारांना विविध प्रकारच्या सवलती देण्यात येणार आहेत. मतदान केल्यानंतर मतदारांना हॉटेल्स बिलांमध्ये व रिक्षा, बस भाड्यांमध्ये सवलत देण्यात येणार आहे.


वसई-विरार महापालिकेची ११५ जागासाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी ११ लाख २६ हजार ४०० इतके मतदार आहेत. या मतदारांनी मतदानाच्या दिवशी घरा बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा यासाठी पालिकेची जनजागृती मोहीम सुरू आहे.


याच पार्श्वभूमीवर नुकताच महापालिकेत महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका क्षेत्रातील हॉटेल्स असोसिएशन, रिक्षा युनियन, परिवहन सेवा पदाधिकारी यांच्यात बैठक पार पडली. निवडणूक हा लोकशाहीचा एक उत्सव आहे, मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून या उत्सवात मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवावा या उद्देशाने मतदानाच्या दिवशी मतदान करणाऱ्या मतदारांना हॉटेल्सच्या बिलांमध्ये, रिक्षा व बस प्रवासभाड्यामध्ये सवलत देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार मतदान करणाऱ्या मतदारांना सदर मतदानाच्या दिवशी हॉटेलच्या बिलामधून १५ टक्के सवलत, रिक्षा भाड्यामध्ये ५० टक्के सवलत, परिवहन विभागाच्या बस मध्येही विशेष सवलत दिली जाणार आहे.मतदानाच्या दिवशी नागरिकांनी घराबाहेर पडून उस्फुर्तपणे मतदान करावे यासाठी रिक्षा, हॉटेल चालक, केशकर्तनालय यांच्या सहकार्याने विशेष सवलती देण्यात आल्या आहेत असे महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक