संत तुकाराम

डॉ. देवीदास पोटे

हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा
हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा ।
चित्त शुद्धी सेवा देवाची हे ॥१॥
आवडी विठ्ठली गाई जे एकांती ।
अलभ्य ते येती लाभ घरा ॥ध्रु.॥
आणीका अंतरी न द्यावी वसति ।
करावी हे शांती वासनेची ॥२॥
तुका म्हणे बाण हाचि निर्वाणींचा ।
बा उगी हे वाचा वेचू नये ॥३॥

संत तुकाराम महाराजांची अभंगवाणीतून एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे विचारांना दिशा मिळते. परमेश्वराला अंतरंगात ठाव देऊन आपले अवघे आयुष्य कृतार्थ करण्याचा मंत्र तुकोबारायांनी दिला. त्यांनी काम, क्रोध आदी षडरियूंचा विठ्ठलचरणी समर्पण केले. पापपुण्याच्या पायऱ्या ओलांडून ते स्वर्गाचं सुख अनुभवू लागते. पाप-पुण्य या दोन्ही बाबींची आता गरज राहिली नाही. परमेश्वराच्या समीप गेल्याची ही अवस्था आहे.
मात्र या परम अवस्थेपर्यंत जाण्यासाठी तुकाराम महाराजांना मोठा आंतरिक संघर्ष करावा लागला. मानवी मनाला मोह पाडणाऱ्या अनेक प्रकारच्या रिपुंशी झगडावेे लागलेः षडरिपुंचा अडथळा दूर करावा लागला. या अनुभवातून गेल्यामुळेच आपल्या अनुभूतीचे सार ते सांगतात. ते म्हणतात, 'आपले खरे हित साधायचे असेल तर दंभ वा खोटोपणा दूर ठेवा. स्वच्छ, शुद्ध मनाने परमेश्वराची आळवणी करा. मन शुद्ध करणे ही देवाची सेवाच आहे. विठ्ठल हा सर्व विश्वाचा विधाता आहे. विठ्ठलाचे नाम अमृतासारखे आहे. विठ्ठलनामाची आळवणी नीरव एकांतात आपल्या हृदयात करा. मग पाहा, अलभ्य वाटणारे लाभही तुम्हाला कसे प्राप्त होतात ते'. विठ्ठलनामाच्या चिंतनाव्यतिरिक्त मनात इतर कुठल्याही गोष्टींना थारा देऊ नका. वासना ही माणसाला अनेक वाईट गोष्टींकडे वळवते. त्या वासनेला भक्तिमार्गाकडे वळवा आणि भक्तिरंगाच्या अपूर्व आनंदाने वासनेची शांती करा. मम षडरियुंचा काळोख वितळून जातो आणि उजेडाचे पर्व सुरू होते. 'नित्य नवा दिस जागृतीचा' अशी आपली अवस्था होते. हाच निर्वाणीचा आणि अखेरचा रामबाण उपाय आहे. याव्यतिरिक्त इतर कुठल्याही बाबतीत आपली वाणी व्यर्थ खर्च करू नये.
संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीतील त्यांचा अमृतमय उपदेश हाच आपल्या हिताचा राजमार्ग आहे, हेच आपले सुखाचे माहेर आहे.
Comments
Add Comment

Ujjain Mahakaleshwar : महाकालच्या भक्तांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या घ्या भस्म आरतीचं दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनानं आपल्या आयुष्यातील संकटे आणि

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या

एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !

धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन

कधी आहे पापमोचनी एकादशी ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ? कशी करावी या दिवशी पूजा ?

मुंबई : हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. हा दिवस

कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?

भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा