'मुंबई'चं नाव 'बॉम्बे' करण्याची भीती घालणाऱ्या 'उद्धव मामूं'चा राणेंनी काढला मुखवटा; ट्विटरवर आक्रमक पवित्रा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी रणसंग्रामात भाजपने आता आक्रमक हिंदुत्वाचा पवित्रा घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी महायुती सत्तेत आल्यास मुंबईचे नाव बदलून 'बॉम्बे' होईल, असा जो दावा केला होता, त्याला मंत्री नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. "मुंबईचे नाव 'बॉम्बे' होणे कधीच शक्य नाही, मात्र उद्धव ठाकरे सत्तेत आले तर मुंबईचे 'मोहम्मद लँड' होणे मात्र निश्चित आहे," अस नितेश राणे यांनी म्हंटल आहे.


उद्धव ठाकरेंच्या 'मुस्लिम लांगुलचालना'वर बोट


नितेश राणे यांनी आपल्या (X) पोस्टमधून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख 'उद्धव मामू' असा करत त्यांच्या बदललेल्या राजकीय भूमिकेची खिल्ली उडवली आहे. राणे यांच्या मते, उद्धव ठाकरे हे केवळ मतपेढीच्या राजकारणासाठी विशिष्ट समाजाचे लांगुलचालन करत आहेत. जर महापालिकेत पुन्हा ठाकरेंची सत्ता आली, तर मुंबईची मूळ ओळख पुसली जाऊन ती एका ठराविक विचारधारेची 'लँड' बनवली जाईल, अशी भीती राणे यांनी व्यक्त केली आहे.


मुंबईची अस्मिता भाजपच्या हाती सुरक्षित!





नितेश राणे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून हे स्पष्ट केले की, मुंबईचे नाव बदलण्याचे धाडस कोणीही करू शकत नाही आणि महायुती असे कधीच करणार नाही. मात्र, उद्धव ठाकरे हे जनतेची दिशाभूल करून भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. "मुंबईची संस्कृती आणि मराठी माणसाचा हक्क केवळ भाजपच सुरक्षित ठेवू शकते, तर ठाकरे गट मुंबईला 'मोहम्मद लँड' बनवण्याच्या मार्गावर आहे," असे विधान राणे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

धारावी ते घाटकोपरमधील प्रक्रिया केलेले मलजल भांडुप संकुलात

पाणी वहन करण्यासाठी संकुलात ९७० लिटर क्षमतेचा जलबोगद्याची उभारणी मलजल प्रक्रिया केंद्रातील पाणी वहन करणाऱ्या

मुंबईकरांनो, राणीबागे भरणार पुष्पोत्सव, कोणत्या तारखेला ते जाणून घ्या..

मुंबई : शिशिर ऋतूची चाहूल लागली की मुंबईकरांना वेध लागतात ते ‘मुंबई पुष्पोत्सवाचे’. घड्याळाच्या काट्यावर आणि

DCM Sunetra Pawar : महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा अल्प परिचय

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. राज्याच्या पहिल्या महिला

DCM Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांनी घेतली राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढत राष्ट्रवादी

रंगणार थरार वर्ल्डकपचा! भारत पाकिस्तान आमने सामने, जाणून घ्या वर्ल्ड कप कधी? कुठे? पाहता येणार ....

मुंबई : विश्वचषकाच्या स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की अपेक्षा कमाल स्तरावर पोहोचतात. आता हीच उत्सुकता

मुंबईतील कोस्टल रोडवर सहा ठिकाणी बायोटॉयलेटची सुविधा

प्रोमेनाडवर पादचारी भुयारी मार्गात उभारण्यात आली ही सुविधा मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी