खारघर-कामोठ्यात कमी दाबाने पाणीपुरवठा

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीत गळती आढळून आल्याने गुरुवारी पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे.


मोरबे धरणातून भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राकडे येणाऱ्या २०५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीत ही गळती आढळल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव तातडीने पाणीपुरवठा बंद करण्यात आला. या बिघाडाचा परिणाम नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासह सिडकोच्या खारघर व कामोठे परिसरावर होणार असून, आज सायंकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने व कमी प्रमाणात होईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.


महानगरपालिकेच्या अधिकृत माहितीनुसार, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राजवळ जलवाहिनीत तांत्रिक बिघाड लक्षात येताच दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. या दुरुस्तीसाठी सकाळी ११.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणा पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे.


उद्या सकाळपासून पाणीपुरवठा नियमित वेळापत्रकानुसार सुरळीत करण्यात येईल, असा अंदाज महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. अनपेक्षित तांत्रिक कारणांमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीत नागरिकांनी पाणी जपून वापरावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त शहर अभियंत्यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक; मंत्री आदिती तटकरे

मुंबई :  रस्त्यावर राहणाऱ्या, अनाथ, एकल आणि दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ पथदर्शी योजना सहा

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

टेक-महाइम्पॅक्ट परिषदेत पहिल्याच दिवशी १५० कोटींचे करार

मुंबई : राज्याच्या तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकासाला मोठी गती देण्यासाठी ‘आयटी’ विभागाच्या वतीने बुधवारी

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत; कृषि मंत्री दत्तात्रय भरणे

द्राक्ष पिकाचा समावेश करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी