‘मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झाले तरी विकास जमला नाही’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर टीका


नागपूर : "मी नगरसेवक होईल किंवा राजकारणात इतका पुढे जाईन, असे कधीच वाटले नव्हते; पण नागपूरकरांच्या आशीर्वादामुळे मी आमदार आणि मुख्यमंत्री कधी झालो हे समजलेही नाही. आज जे लोक मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झाले, ते शहराचा विकास करू शकले नाहीत, ते आता काय विकास करणार?" अशा बोचऱ्या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. अभिनेता भारत गणेशपुरे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी घेतलेल्या एका विशेष मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी नागपूरच्या विकासाचे मॉडेल आणि भविष्यातील योजनांवर सविस्तर भाष्य केले.


राज ठाकरे यांच्या एका विधानाचा संदर्भ देत फडणवीस मिश्किलपणे म्हणाले की, "राज ठाकरेंनी मला मुंबईच्या बाहेरच ठरवल्यामुळे मी आता अधिकृतपणे 'सर्टिफाईड नागपूरकर' झालो आहे." आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी नागपूरच्या जनतेने दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


फडणवीस म्हणाले की, मुंबईमध्ये सर्वाधिक नाव नितीन गडकरी यांचे नाव घेतले जाते. त्यांनी ५५ ब्रिज तयार केले. मुंबई पुण्यानंतर सर्वाधिक लोकसंख्येचा नागपुर शहर आहे. या शहरात भरपूर आधुनिकता आहे. नागपुरात सांडपाणी प्रक्रिया होते यामध्ये सांडपाणी मध्ये प्रक्रिया करून निर्मिती करून पैसा गमावणारा पहिला शहर झाले.चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचं मॉडेल नागपुर मध्ये तयार केले जात आहे. आजही येथे पाण्यासाठी मोर्चे
निघत नाही.


दीक्षा भूमी होणार आंतरराष्ट्रीय स्थळ


नागपूर शहराची आळेख दीक्षाभूमीचे शहर अशीही आहे. हे स्थान पवित्र आणि ऐतिहासिक स्थान आहे. १९९७ मध्ये मी महापौर असताना आणि नितीन गडकरी पालकमंत्री असताना दीक्षाभूमी येथील पाण्याची व अन्य गोष्टी केल्या. आता देखील २०० कोटी रुपये खर्चून दीक्षा भूमी आंतरराष्ट्रीय स्थळ व्हावे असं काम सुरू आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली. मला किंवा नितीन गडकरी यांना संधी मिळाली, तेव्हा आम्ही नागपूरला डोळ्यासमोर ठेवले हे खरे आहे, पण इतर शहरांकडे दुर्लक्ष केले नाही. मुंबईचे बदललेले स्वरूप असो किंवा पुणे आणि संभाजीनगरचा विकास, हे सर्व आमच्या काळातच झाले. समृद्धी महामार्गाचा फायदा केवळ नागपूरला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील व्यवसायांना होत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Nashik Kumbhmela : १००८ खालसांना सुविधा द्या, शाही स्नान मार्ग रुंद करा- महंत संजय दास यांची मागणी

Nashik Kumbhmela : आखाड्यांसाठी आवश्यक जमीन जवळच्या परिसरात उपलब्ध करून द्यावी, शाही स्नानाच्या मार्गाचे रुंदीकरण करून

Spain vs Argentina : अंतिम सामन्यांनंतर अर्जंटिनाला मोठा धक्का ! फिफाकडून खेळाडूंवर कारवाईची शक्यता; नेमकं प्रकरण काय ?

मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेनने १-० ने अर्जेंटिनाचा पराभव केला होता. अंतिम सामन्यांनंतर

Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले 'हे' ५ महत्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत

Sikkim Landslide PM Modi : समरदुंग बोगदा अपघात प्रकरणी पंतप्रधानांनी साधला सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सिक्कीममधील नामची जिल्ह्यातील झोलुंगे अंतर्गत समरदुंग येथे

FIFA WORLDCUP 2026 : स्पेनचा विश्वचषक विजेता संघ मायदेशी परतला; माद्रिदमध्ये २० लाख लोकांकडून ऐतिहासिक आणि शाही स्वागत

माद्रिद: न्यू जर्सी येथे पार पडलेल्या रोमांचक अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा १-० अशा गोलने पराभव करत विश्वचषक

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,