कुणाच्याही भूलथापांना, दबावाला बळी पडू नका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन


नवी मुंबई : कुणाच्याही भुलथापा वा दबावाला बळी पडण्याचे कोणतेही कारण नाही. ही निवडणूक पूर्णपणे निर्भय, पारदर्शक आणि लोकशाही मार्गानेच पार पडली पाहिजे, असे ठाम वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत केले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला वेग दिला असून, प्रमुख नेत्यांचे शहरागणिक दौरे सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो प्रथम ठाण्यात तर त्यानंतर नवी मुंबईत पार पडला. या रोड शोदरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधत निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडण्याचे आवाहन केले.


यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, “कुणाचीही गुंडागिरी, दादागिरी, पैसे वाटप खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रकारांना मोडून काढल्याशिवाय राहणार नाही.” तसेच पोलिसांना उद्देशून ते म्हणाले, “ही निवडणूक अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली पाहिजे. कुठेही कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होता कामा नये. निवडणुका येतील-जातील, पण कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू.” “कुठल्याही दबावाखाली कोणतेही काम होता कामा नये. निवडणुका निर्भयपणे आणि लोकशाही मूल्यांनुसारच झाल्या पाहिजेत,” असे स्पष्ट शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकात RPF जवानावर तिघांचा हल्ला; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानावर तिघांकडून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर

Kalyan Crime News : कल्याणमध्ये टवाळखोरांचा हैदोस! गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीला बेदम मारहाण, डोक्यात बाटल्या फोडल्या

कल्याण: कल्याण पूर्व परिसरात पुन्हा एकदा टवाळखोरांची दहशत समोर आली आहे. गार्डनमध्ये बसून गप्पा मारत असलेल्या

Thane Murder Case : ठाण्यात थरारक हत्याकांड; प्रियकराची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये लपवला!

ठाणे : उत्तर प्रदेशातील मेरठ ड्रम हत्याकांडासारखीच एक धक्कादायक घटना ठाण्यातील मुंब्रा परिसरात समोर आली आहे.

Deputy Chief Minister Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ईव्ही गाडीचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रतिसाद पंतप्रधान

Bhiwandi Water Cut : भिवंडीकरांनो पाणी जपून वापरा! शहरात उद्यापासून २४ तास पाणीपुरवठा बंद; 'या' भागात होणार परिणाम

ठाणे : भिवंडी शहराला पाणीपुरवठा (Bhiwandi Water Cut) करणाऱ्या यंत्रणेमध्ये तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

Kalyan : लोकलच्या छतावर जीवघेणा स्टंट; कल्याण रेल्वे स्थानकावर गोंधळ

कल्याण : ऐन गर्दीच्या वेळी कामावर जाण्याची वेळ आणि कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यानची रेल्वे वाहतूक खोळंबली, कारण