पश्चिम बंगालमध्ये रणकंदन! ईडी अधिकाऱ्यांचा मोबाईल खेचून ममता दीदींची गुंडागर्दी का ईडीची चूकभूल? वाद शिगेला...

मुंबई: बंगालमधील रणकंदन शिगेला गेले आहे. अंमलबजावणी संचनालयाने (Enforcement Directorate ED) आयपॅक (Indian Political Action Committee IPAC) वर घातलेल्या धाडीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हस्तक्षेप केल्याने प्रकरण चिघळले आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यलयात ईडी अधिकाऱ्यांनी घेराव घातल्यानंतर स्वतः ममता बॅनर्जी तिकडे पोहोचल्या व सुत्रांच्या माहितीनुसार,त्यांनी चौकशी अधिकाऱ्यांच्या हातातील मोबाईल खेचून घेतल्याने तेथे हाय वोल्टेज ड्रामा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी स्पष्ट केले आहे.


ईडीने अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप करत सरकारविरोधात न्यायालयात धाव घेतली असताना ममता बॅनर्जी यांनी विविध ठिकाणी ईडी विरोधात तीन एफआयआर (First Hand Information Report FIR) दाखल केले आहेत. त्या कथित प्रकरणात बॅनर्जी यांनी आपल्या पक्षाच्या संवेदनशील माहितीची चोरी केल्याचा आरोप ईडीवर केला आहे. तसेच ईडीकडूनही बंगाल सरकारवर चौकशीत बाधा आणल्याचा आरोप केला गेला होता.


या प्रकरणी ईडीने दिलेल्या माहितीनुसार,तपास सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांची सुरक्षा यंत्रणा तिथे मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. याशिवाय सरकारकडून कोणतीही कारवाई न करता उलट ईडीवर दबावतंत्राचा वापर केला गेला असा आरोप ईडीने केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी ईडी अधिकाऱ्यांचे खच्चीकरण केल्याचा आरोपही प्रत्यक्षदर्शी ईडी अधिकाऱ्यांनी केला आहे.


संबंधित प्रकरण न्यायालयात गेले असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईडीवर आरोपांची फैरी झाडून विविध आरोप केले आहेत. ममता बॅनर्जी यांनी ईडीवर ट्रेसपासिंग (विना परवानगी प्रवेश निषिद्ध क्षेत्रात घुसखोरी),संवेदनशील माहिती डेटा चोरी करणे व पुरावे नष्ट करणे असे गंभीर आरोप केले आहेत. दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले असताना हे न्यायप्रविष्ट प्रकरण झाले आहे. आजची सुनावणी पुढे ढकलत आता १४ जानेवारीला पुढील सुनावणी अपेक्षित आहे. यापूर्वीही ममता बॅनर्जी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. या निमित्ताने ममता दीदींचे विरोधक ममता दीदींची गुंडागर्दी म्हणून दीदीवर आरोप करत आहेत. तर ममता दीदीही ईडीवर गंभीर आरोप करत आहेत.

Comments
Add Comment

अजित पवारांच्या अस्थी नेताना पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर

मुंबई: दि.१ फेब्रुवारी - आम्ही एनडीएसोबत आहोत आणि कायम सोबत राहण्याचा निर्णय झालेला असून मी कोणतीही गोष्ट

आत्मनिर्भर नवा भारत घडवण्याच्या प्रक्रियेतील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प : मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि.१: प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर नवा भारत घडवण्याच्या प्रक्रियेतील

महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी!

विकसित भारताकडे दमदार पाऊल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. १:- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या

आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या मार्गावर नेणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला

भूतान, नेपाळ, श्रीलंका याविश्वासू मित्रांसाठी मदतीचा हात, संबंधातील कडवटपणामुळे बांगलादेशला आर्थिक झटका

नवी दिल्ली  : केंद्रातील मोदी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या परराष्ट्र धोरणाचे

इतर देशांच्या तुलनेत किती मोठे आहे देशाचे संरक्षण बजेट

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर केले. यंदाच्या बजेटमध्ये भारताच्या