महायुतीचे उमेदवार बिनविरोध आल्याची विरोधकांना पोटदुखी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल


कल्याण : विरोधकांना निवडणुकीसाठी उमेदवार मिळत नव्हते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. तुम्हाला दु:ख का होत आहे? महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्याविषयी विरोधकांकडून नवा नरेटिव्ह पसरविला जात आहे. महायुतीचे उमेदवार जिंकून आले. यापूर्वी एव्हीचा नरेटिव्ह पसरविला गेला. आता बिनविरोधला विरोध करण्यास विरोधकांनी सुरुवात केली असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढविला.


केडीएमसीच्या निवडणुकीत पहिल्याच टप्प्यात महायुतीचे २१ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. यावरून विरोधकांनी टीका केली आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


महापालिका निवडणुकीसाठी कल्याण पूर्वेत आयोजित जाहीर प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपरोक्त टोला विरोधकांना लगावला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, यापूर्वी संसदेत ३५ खासदार बिनविरोध निवडून आले होते, त्यापैकी ३३ खासदार हे काँग्रेसचे होते. त्यावेळी लोकशाही जिवंत होती आणि आत्ता महायुतीचे उमेदवार निवडून आले, तर लोकशाहीची हत्या झाली, अशी टीका करणाऱ्या या सर्व विरोधकांनी कुठे तरी आरसा पाहिला पाहिजे, असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे.


कल्याण, डोंबिवली शहराची ओळख हिंदुत्ववादी आहे. गेल्या ७० वर्षांत शहरांचा विकास झाला नाही. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला ५० हजार कोटी रुपयांचा विकास निधी मिळाला आहे. २०१४ पूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकासाच्या माध्यमातून एमएमआर रिजनमधील शहरांना विकास निधी मिळत नव्हता. महायुती सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपने ४ लाख कोटींचा निधी एमएमआर रिजनमधील शहरांच्या विकासासाठी दिला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

IIT मुंबई काडतूस प्रकरण : मुख्य सूत्रधारासह संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त; राज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत माहिती

पुरवठादारासह विक्रेत्यालाही ठोकल्या बेड्या मुंबई : देशातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या आयआयटी (IIT) पवई

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज