महायुतीचे उमेदवार बिनविरोध आल्याची विरोधकांना पोटदुखी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल


कल्याण : विरोधकांना निवडणुकीसाठी उमेदवार मिळत नव्हते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. तुम्हाला दु:ख का होत आहे? महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्याविषयी विरोधकांकडून नवा नरेटिव्ह पसरविला जात आहे. महायुतीचे उमेदवार जिंकून आले. यापूर्वी एव्हीचा नरेटिव्ह पसरविला गेला. आता बिनविरोधला विरोध करण्यास विरोधकांनी सुरुवात केली असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढविला.


केडीएमसीच्या निवडणुकीत पहिल्याच टप्प्यात महायुतीचे २१ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. यावरून विरोधकांनी टीका केली आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


महापालिका निवडणुकीसाठी कल्याण पूर्वेत आयोजित जाहीर प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपरोक्त टोला विरोधकांना लगावला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, यापूर्वी संसदेत ३५ खासदार बिनविरोध निवडून आले होते, त्यापैकी ३३ खासदार हे काँग्रेसचे होते. त्यावेळी लोकशाही जिवंत होती आणि आत्ता महायुतीचे उमेदवार निवडून आले, तर लोकशाहीची हत्या झाली, अशी टीका करणाऱ्या या सर्व विरोधकांनी कुठे तरी आरसा पाहिला पाहिजे, असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे.


कल्याण, डोंबिवली शहराची ओळख हिंदुत्ववादी आहे. गेल्या ७० वर्षांत शहरांचा विकास झाला नाही. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला ५० हजार कोटी रुपयांचा विकास निधी मिळाला आहे. २०१४ पूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकासाच्या माध्यमातून एमएमआर रिजनमधील शहरांना विकास निधी मिळत नव्हता. महायुती सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपने ४ लाख कोटींचा निधी एमएमआर रिजनमधील शहरांच्या विकासासाठी दिला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

सांताक्रुझमध्ये सिलेंडर स्फोट, चार जखमी

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील सांताक्रुझ पश्चिम येथून एक धक्कादायक बातमी आली आहे. सांताक्रुझ पश्चिमेच्या

अफगाणिस्तानचा कॅनडाविरुद्धच्या सामन्यात मोठा विजय

चेन्नई : इब्राहिम झद्रानच्या वादळी फलंदाजीनंतर मोहम्मद नबीने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने

चेक बऊन्सप्रकरणी दिलासा मिळाल्यानंतर राजपालचा नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : तिहारमधून बाहेर आल्यानंतर अभिनेता राजपाल यादव तातडीने उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथे त्याच्या

भोगवादी प्रवृत्तीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केली चिंता

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : प्राचीन शिक्षणपद्धतीत मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण दिले जात होते. मात्र

महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी साधला अंतराळवीरांशी संवाद

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारताचे पहिले अंतराळवीर विंग कमांडर (निवृत्त) राकेश शर्मा व भारताचे दुसरे अंतराळवीर

शिवजयंती उत्सव निमित्त मुंबईत विविध ठिकाणी कार्यक्रम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त, मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित