घातक बेबी फूडवर नेस्ले इंडियाचे महत्वाचे विधान कंपनी म्हणते ही उत्पादने आम्ही भारतात....

प्रतिनिधी: नेस्ले कंपनीच्या उत्पादनात लहान मुलांसाठी घातक घटक पदार्थ असल्याची चौफेर टीका झाल्यानंतर भारतात ही उत्पादने विकली गेलीच नसल्याचा दावा नेस्ले इंडिया (Nestle India) कंपनीकडून करण्यात आला आहे. बाळाच्या आरोग्यासाठी घातक असलेल्या सेरेलुईड टॉक्सॉइड (Cereulide Toxin) असलेल्या घटकांचा समावेश नव्या विकल्या जाणाऱ्या भारतीय उत्पादनांच्या बॅचमध्ये नसल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. आपल्या निवेदनात नेस्ले इंडियाने म्हटले आहे की, त्यांनी देशात अलीकडे परत मागवलेल्या उत्पादनांपैकी कोणतेही उत्पादन विकलेले किंवा आयात केलेले नाही. कंपनीने पुढे सांगितले की, भारतात विकले जाणारे सर्व शिशु फॉर्म्युला ब्रँड्स स्थानिक पातळीवर उत्पादित केले जातात.' कंपनीच्या जगभरातील उत्पादनातील घटकांवर टीका झाल्यावर नेस्ले मूळ कंपनीने काही बेबी फॉर्म्युला उत्पादने जागतिक स्तरावर परत मागवल्यानंतर हे विधान आले आहे.


'नेस्ले इंडिया परत मागवलेल्या किंवा मागे घेतलेल्या उत्पादनांपैकी किंवा बॅचपैकी कोणतेही उत्पादन आयात करत नाही किंवा विकत नाही' असे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.'भारतात विकले जाणारे सर्व शिशु फॉर्म्युला ब्रँड्स स्थानिक पातळीवर उत्पादित केले जातात. आम्ही या उत्पादनांवर सखोल चाचणी केली आहे आणि आम्ही याची पुष्टी करतो की ती सर्व FSSAI आणि लागू नियम व नियमांचे पालन करतात' असेही नेस्ले इंडियाने एका निवेदनात स्पष्ट केले आहे.


यापुढे आपल्या निवेदनात,'आमच्या ग्राहकांची सुरक्षा आणि कल्याण ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आमची सर्व उत्पादने FSSAI आणि लागू नियम व नियमांचे पूर्णपणे पालन करतात. एका प्रमुख पुरवठादाराने पुरवलेल्या घटकामध्ये गुणवत्तेची समस्या आढळल्यानंतर, नेस्लेने युरोपमध्ये उत्पादित केलेल्या काही शिशु फॉर्म्युला उत्पादनांच्या बॅचसाठी काही देशांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून उत्पादन परत मागवणे/मागे घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत संबंधित उत्पादनांमुळे कोणत्याही आजाराची पुष्टी झालेली नाही' असेही त्यात म्हटले आहे.


यापूर्वीही २०२३ मध्ये कंपनीच्या बेबी फूडवर तज्ञांनी टीका केली होती. त्यानंतर यासंबंधीची भारताच्या अन्न सुरक्षा नियामक मंडळ एफ एसएसएआय (FISAAI) ने चौकशी केली होती. त्यामुळेच जानेवारी २०२६ मध्ये स्विस पॅकेज्ड फूड कंपनीने मंगळवारी काही बेबी फॉर्म्युला उत्पादने परत मागवली होती. बाळाच्या अन्नात एक विषारी पदार्थ असू शकतो ज्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते अशी चिंता व्यक्त केली जात असल्याने कंपनीनेही तपासणीसाठी जुन्या बँचची उत्पादने परत मागवली होती.जागतिक कंपनीने म्हटले आहे की, 'एका प्रमुख पुरवठादार (Suppplier) पुरवलेल्या घटकामध्ये गुणवत्तेची समस्या आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.'


विशेषतः जानेवारी २०२६ मध्ये विषाच्या जोखमीवर (सेरुलाइड) बेबी फॉर्म्युला मुद्दा आणि २०१५ च्या मॅगी नूडल्स लीड प्रमाण भयावतेसारखे भूतकाळातील वाद यासारख्या प्रमुख बाबींबद्दल अन्न नियामकाकडून कंपनीच्या उत्पन्नाची चौकशी केली असताना नेस्ले अनेकदा रिकॉलवर सहकार्य करते असे कंपनीने म्हटले होते.अनेकदा कंपनीने अशा निकालावर न्यायालयात नियामक कृतींना आव्हान दिले आहे. कंपनीचा मते,ते त्यांच्या स्वतःच्या कठोर नियंत्रणांवर भर देतात तर अधिकारी सार्वजनिक संरक्षण आणि अनुपालनावर लक्ष केंद्रित करतात.आता मध्यपूर्वेतील ईडीई (Emirates Drug Establishment EDE) नियामकांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने नेस्लेने आपल्या जुन्या उत्पादने परत मागवत त्याची चिकित्सा सुरू केली आहे.

Comments
Add Comment

Best Budget Bike : दिखाऊपणा कशाला? ७० किमी मायलेज आणि ५५ हजारांपासून किंमत; बजेटमधील ५ सर्वोत्तम बाईक!

सध्याच्या काळात महागाई आणि सतत वाढणारे इंधनाचे दर यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरि

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी

Panchkula Murder Case : पंचकुलात खळबळ! मोलकरणीनेच केली रिटायर्ड कॅप्टनच्या पत्नीची हत्या; सीसीटीव्हीमुळे बिंग फुटले

Haryana : हरियाणामधील पंचकुला येथे घडलेल्या एका थरारक आणि खळबळजनक हत्याप्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Eknath Shinde : 'शिवसेना कोणाची?' जनतेनेच दिला कौल; ४० चे ६० आमदार करून जनतेने शिक्कामोर्तब केलं

मुंबई : शिवसेना पक्षाच्या मालकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी