राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई : आम्हाला आमच्या मर्यादेची...शक्तीस्थळाची कल्पना आहे... तरीपण आमचे एक वेगळे अस्तित्व आहे ते घेऊन आम्ही यावेळेला मुंबई शहरात निवडणूकीला सामोरे जात असून आज मुंबईकरांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करत त्यामुळे तमाम मुंबईकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले. राष्ट्रवादी काँग्रेसने आज जाहीर केलेल्या जाहिरनाम्यात, पायाभूत सुविधा आणि विकास- यावर भर देण्यात आला आहे, मुंबईतील रस्ते, पूल, आणि प्लायओव्हरचे आधुनिकीकरण करताना पाच वर्षांत ५०० किमी नवे रस्ते बांधणार आहे. जुन्या चाळी आणि झोपडपट्टीमध्ये मोफत पाणी पुरवठा केला जाईल.प्लास्टिक बंदी कडक करणे, सफाई कामगारांना लाड-पागे समितीच्या धोरणानुसार मोफत घरे आणि आरोग्य विमा योजनांचा लाभ दिला जाईल. प्रत्येक वॉर्डात प्रगत प्राथमिक आरोग्य केंद्र, मोफत वैद्यकीय तपासणी उभारणार,मनपा शाळांचे आधुनिकीकरण, डिजिटल क्लासरुम आणि मोफत पौष्टिक आहार योजना, स्मार्ट वर्गखोल्या आणि एआय तंत्रावर आधारीत शाळांचे व्यापक डिजीटलायझेशनवर भर, मुंबईला ग्रीन सिटी बनवताना १० लाख झाडे लावून उद्यानांचा विस्तार करणे, प्रदूषण नियंत्रणासाठी इलेक्ट्रिक बस आणि सीएनजी वाहनांना प्रोत्साहन, दिव्यांगासाठी मुंबई मेट्रोमध्ये पूर्ण सवलत तसेच विविध सुविधांसाठी पाठपुरावा करणार, दिव्यांग, लहान मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनाच सुरक्षित चालता यावे यासाठी सर्वच पादचारी पथ (फुटपाथ) अतिक्रमणमुक्त राहतील यावर विशेष भर देणार,एक लाख नव्या घरांची निर्मिती आणि एसआरए योजनेचे वेगवान अंमलबजावणी, ७०० स्क्वेअर फुटांपर्यंत प्रॉपर्टी टॅक्स माफ,महिलांसाठी सुरक्षित मुंबई अभियान, सीसीटीव्ही हेल्पलाईन आणि पोलीस पेट्रोलिंग वाढवणे, वर्किंग वुमन होस्टलची प्रभावी उभारणी आदी मुद्यांचा जाहिरनाम्यात समावेश आहे. आम्हाला आमच्या मर्यादेची...शक्तीस्थळाची कल्पना आहे... तरीपण आमचे एक वेगळे अस्तित्व आहे ते घेऊन आम्ही यावेळेला मुंबई शहरात निवडणूकीला सामोरे जात असून आज मुंबईकरांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करत त्यामुळे तमाम मुंबईकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले. राष्ट्रवादी काँग्रेसने आज जाहीर केलेल्या जाहिरनाम्यात, पायाभूत सुविधा आणि विकास- यावर भर देण्यात आला आहे, मुंबईतील रस्ते, पूल, आणि प्लायओव्हरचे आधुनिकीकरण करताना पाच वर्षांत ५०० किमी नवे रस्ते बांधणार आहे. जुन्या चाळी आणि झोपडपट्टीमध्ये मोफत पाणी पुरवठा केला जाईल.प्लास्टिक बंदी कडक करणे, सफाई कामगारांना लाड-पागे समितीच्या धोरणानुसार मोफत घरे आणि आरोग्य विमा योजनांचा लाभ दिला जाईल. प्रत्येक वॉर्डात प्रगत प्राथमिक आरोग्य केंद्र, मोफत वैद्यकीय तपासणी उभारणार,मनपा शाळांचे आधुनिकीकरण, डिजिटल क्लासरुम आणि मोफत पौष्टिक आहार योजना, स्मार्ट वर्गखोल्या आणि एआय तंत्रावर आधारीत शाळांचे व्यापक डिजीटलायझेशनवर भर, मुंबईला ग्रीन सिटी बनवताना १० लाख झाडे लावून उद्यानांचा विस्तार करणे, प्रदूषण नियंत्रणासाठी इलेक्ट्रिक बस आणि सीएनजी वाहनांना प्रोत्साहन, दिव्यांगासाठी मुंबई मेट्रोमध्ये पूर्ण सवलत तसेच विविध सुविधांसाठी पाठपुरावा करणार, दिव्यांग, लहान मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनाच सुरक्षित चालता यावे यासाठी सर्वच पादचारी पथ (फुटपाथ) अतिक्रमणमुक्त राहतील यावर विशेष भर देणार,एक लाख नव्या घरांची निर्मिती आणि एसआरए योजनेचे वेगवान अंमलबजावणी, ७०० स्क्वेअर फुटांपर्यंत प्रॉपर्टी टॅक्स माफ,महिलांसाठी सुरक्षित मुंबई अभियान, सीसीटीव्ही हेल्पलाईन आणि पोलीस पेट्रोलिंग वाढवणे, वर्किंग वुमन होस्टलची प्रभावी उभारणी आदी मुद्यांचा जाहिरनाम्यात समावेश आहे.

Comments
Add Comment

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या