मुंबईतील माजी महापौरांच्या मालमत्तेत कोट्यवधींची वाढ

उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर


मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणूक रिंगणात चार माजी महापौर उतरले असून त्या सर्वांची मालमत्ता कोट्यवधींच्या घरांत गेली आहे. यामध्ये माजी महापौर श्रध्दा जाधव, किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत, मिलिंद वैद्य आणि उपमहापौर हेमांगी वरळीकर यांची सन २०१७च्या निवडणुकीमध्ये दाखवलेल्या मालमत्तेच्या तुलनेत ही वाढ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. एका बाजूला कोरोना काळात सर्वांचे नोकरी, व्यवसाय डबघाईला तसेच आर्थिक संकटात लोटले गेले होते, तिथे माजी महापौरांच्या आमदनीमध्ये मात्र विलक्षण वाढ झाल्याचे दिसून येत आहे.


मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. या अर्जासोबत उमेदवारांनी आपले प्रतिज्ञापत्र सादर केले असून त्यामध्ये उत्पन्न आणि मालमत्तेची माहिती दिली आहे. महापालिका विसर्जित होण्यापूर्वी महापालिकेच्या महापौर म्हणून राहिलेल्या किशोरी पेडणेकर यांच्या मालमत्तेत साडेतीन कोटींमध्ये वाढ झाली आहे. सन २०१७ मध्ये १ कोटी ६१ लाख रुपये एवढी मालमत्ता होती, तर हे उत्पन्न वाढून आता ५ कोटी २६ लाख रुपये एवढे झाले आहे. तर सभागृह नेत्या राहिलेल्या माजी महापौर विशाखा राऊत यांच्या मालमत्तेतही सुमारे सहा कोटींनी वाढ झाल्याचे दिसून येते. यापूर्वी त्यांची मालमत्ता ही १४.३७ कोटी रुपये एवढी होती आणि आता ही २१.८३ कोटी रुपये एवढी झाली आहे.


माजी महापौर श्रध्दा जाधव यांच्या मालमत्तेत सुमारे अडीच कोटींनी वाढ झाली आहे. त्यामुळे यापूर्वी त्यांची एकूण मालमत्ता ही ४४.२९ कोटी रुपये एवढी होती, जी आता ४६.३४ कोटी रुपये एवढी आहे. तर माजी महापौर मिलिंद वैद्य यांची मालमत्तेतही १० कोटींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी सन २०१७मध्ये त्यांनी आपली मालमत्ता २.१४ कोटी रुपये एवढी दर्शवली होती. जी आता १३.३९ कोटी रुपये एवढी दर्शवली आहे. तर माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्याही मालमत्तेत सुमारे पाच कोटींनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील २०१७च्या निवडणुकीत हेमांगी वरळीकर यांनी १.८५ कोटी रुपये एवढी मालमत्ता होती, जी आता ७.१३ कोटी रुपये एवढी दर्शवली गेली आहे.


उमेदवार : किशोरी पेडणेकर (माजी महापौर) - (उबाठा) प्रभाग १९९ (सात रास्ता- धोबीघाट)


व्यवसाय : व्यवसाय


 २०२५ पर्यंत एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता : ५,२६,४५,८५६


 सन २०१७ची एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता : १,६१,५३, २५१


उमेदवार : विशाखा राऊत (माजी महापौर) - (उबाठा) प्रभाग १९१ (माहीम-शिवाजी पार्क)


व्यवसाय : व्यवसाय


 २०२५ पर्यंत एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता : २१, ८३,००, ९१५


 २०१७ ची एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता : १४, ३७, ४३,९०५


उमेदवार : श्रद्धा जाधव (माजी महापौर): (उबाठा) प्रभाग २०२ (शिवडी)


व्यवसाय : व्यवसाय


 २०२५ पर्यंत एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता : ४६,३४,७२,४७३


 सन २०१७ ची एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता : ४४,२९,७८,२२०


उमेदवार : हेमांगी वरळीकर (माजी उपमहापौर) - (उबाठा) प्रभाग १९३ (वरळी कोळीवाडा)


व्यवसाय: उल्लेख नाही


 सन २०२५ पर्यंत एकूण जंगम आणि स्थाव र मालमत्ता :७,१३,४४,३७५


 एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता सन २०१७ : १,८५,९३,८६५


उमेदवार : मिलिंद वैद्य (माजी महापौर) (उबाठा) प्रभाग १८२ (माहीम कोळीवाडा, पोलिस कॉलनी )


व्यवसायः व्यवसाय


२०२५ पर्यंत एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता: १३.३९ कोटी रुपये


सन २०१७ची एकूण जंगम आणि स्थावर मालमत्ता:२.१४ कोटी रुपये

Comments
Add Comment

Mumbai Local Train Fire : ब्रेकिंग : विद्याविहार ते कुर्ल्या दरम्यान लोकलच्या डब्याने घेतला पेट; विद्याविहारहून CSMT कडे जाणारी 'स्लो' लोकल सेवा विस्कळीत

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवर आज ऐन गर्दीच्या वेळी एक थरारक घटना घडली. कुर्ला आणि

राज्यात १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी, शाळा-सरकारी कार्यालये राहणार बंद

मुंबई  : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. १५ जानेवारी रोजी २९ महापालिकेसाठी

ईव्हीएम सुसज्ज करण्याच्या कामाची राज्य निवडणूक आयुक्तांकडून पाहणी

मुंबई : राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज विल्सन महाविद्यालयास भेट देऊन बृहन्मुंबई महानगरपालिका

पाणंद रस्ते समितीत सह अध्यक्षांसह परिषद सदस्य अन पाच प्रगतशील शेतकरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय योजना प्रभावी करण्याचे चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे यांचे

धक्कादायक! बापाचं संतापजनक कृत्य, चोरीच्या संशयावरून पोटच्या मुलाला दिले....

मुंबई : मुंबईच्या गोरेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरेगाव येथे वडिलांनी आपल्याच मुलांना

Ambarnath News : अंबरनाथचे काँग्रेसचे १२ नगरसेवक भाजपच्या वाटेवर; मोठी खळबळ

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.