ठाण्यात ११४ उमेदवार अब्जाधीश !

ठाणे : येत्या १५ जानेवारी रोजी ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत असून या निवडणुकीसाठी तब्बल ६४९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रांच्या तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली असून यापैकी ११४ उमेदवार हे अब्जाधीश असल्याचे स्पष्ट झाले आहे. या श्रीमंत उमेदवारांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील उमेदवारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.


मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाच्या परिषा प्रताप सरनाईक (वॉर्ड ५ क, ठाणे) यांनी आपल्या शपथपत्रात तब्बल ३८१ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची नोंद केली आहे. त्यांच्यानंतर बाबाजी पाटील (वॉर्ड २९ क, मुंब्रा) यांची १२६ कोटी रुपयांची मालमत्ता असून कळव्यातील मंदार केणी (वॉर्ड २३ ड) यांच्याकडे १०५ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर झाले आहे.


कोट्यधीश उमेदवारांमध्येही विविध पक्षांचे प्रतिनिधी आहेत. शिवसेनेचे हणमंत जगदाळे (६३.४४ कोटी) आणि मनाली पाटील (६१.६८ कोटी), भाजपच्या प्रतिभा मढवी (४३.५७ कोटी) व नंदा कृष्णा पाटील (५१.२० कोटी), ठाकरे गटाच्या नंदिनी विचारे (४१.८७ कोटी), महेश्वरी तरे (२३.४४ कोटी) व कविता पाटील (५५.८२ कोटी), मनसेच्या रेश्मा पवार (१७.७८ कोटी) तसेच अपक्ष प्रमिला केणी (६१.६८ कोटी) यांचासमावेश आहे.


याउलट, ठाणे महापालिका निवडणुकीतील सर्वात कमी उत्पन्न असलेले उमेदवार मुंब्रा भागातील असून एका उमेदवाराने अवघे २० हजार ५०२ रुपयांचे वार्षिक उत्पन्न दाखवले आहे. आता मतदार कोणाला पसंती देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Dombivli Shardul Vichare : डोंबिवलीच्या शार्दुलने CA इंटरमीडिएटमध्ये देशात पटकावला पहिला क्रमांक

डोंबिवली : डोंबिवलीतून अभिमानाची बातमी समोर आली आहे. डोंबिवलीच्या शार्दुल शेखर विचारे याने इन्स्टिट्यूट ऑफ

Badlapur Accident : भरधाव BMW रस्त्यावर पलटली; भीषण अपघातात दोन जण ठार

बदलापूर : बदलापूर (Badlapur) परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात (Accident) दोन तरुणांचा मृत्यू (Death) झाला असून

Ulhasnagar Lizard In Manchurian : उल्हासनगरात धक्कादायक प्रकार! मंचुरियनमध्ये पालीचे पिल्लू

मुंबई : अन्नसुरक्षेचा (Food Safety) गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. उल्हासनगरमध्ये एका चायनीज सेंटरमधून (Chinese Centre)

Ambernath News: डॉक्टर पतीचा 'तो' त्रास असाह्य; लग्नाच्या दीड महिन्यात नवविवाहितेची आत्महत्या

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambernath) एका २६ वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)

Yamdut Campaign : दिवा स्थानकात रेल्वे पोलिसांची अनोखी ‘यमदूत’ मोहीम; रुळ ओलांडणाऱ्यांचे प्रबोधन

ठाणे: रेल्वे रुळ ओलांडण्याच्या धोकादायक सवयीला आळा घालण्यासाठी आणि वाढते रेल्वे अपघात रोखण्यासाठी ठाणे रेल्वे

Thane News: 4 वर्षीय चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे वाचले बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण; ठाणे वाहतूक पोलिसांची तत्पर कारवाई

ठाणे : चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे आणि ठाणे वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे एका बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण