तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाची पुण्यात आत्महत्या


पुणे : डेक्कन परिसरातील आपटे रस्त्यावरील हॉटेलमध्ये तासगावच्या पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केली. सूरज मराठे असे आत्महत्या करणाऱ्या पोलिसाचे नाव आहे. दिवंगत सूरज मराठे ३० वर्षांचे होते. ते सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते.


मूळचे देहूचे रहिवासी असलेल्या सूरज मराठे यांची महिन्याभरापूर्वी तासगाव पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली. अविवाहीत असलेल्या सूरज मराठे यांना मागील काही दिवसांपासून गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला होता. या गुडघेदुखीवर उपचार करण्यासाठी सूरज मराठे यांनी काही वैद्यकीय चाचण्या करुन घेतल्या होत्या. चाचण्यांचे अहवाल हाती आल्यानंतर सूरज चव्हाण यांनी टोकाचे पाऊल उचलले.


आत्महत्येआधी सूरज मराठे यांनी पोलिसांना उद्देशून एक चिठ्ठी लिहिली. या चिठ्ठीत वैद्यकीय कारणामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट नमूद आहे. वैद्यकीय कारणाचे तशील अद्याप समजलेले नाही. पोलिसांनी सूरज मराठे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणात तपास सुरू आहे.


Comments
Add Comment

Ravi Pandit Passes Away : पुण्यातील नामांकित उद्योजक रवी पंडित यांचे निधन; आयटी क्षेत्रातील दूरदर्शी नेतृत्व हरपले...

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि KPIT Technologies चे संस्थापक व अध्यक्ष रवी पंडित यांचे आज (८ मे) पुण्यात निधन झाले. कंपनीने

Chief Minister Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केपीआयटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित यांना श्रद्धांजली

देशातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या पहिल्या फळीतील मार्गदर्शक उद्योजक हरपला मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या

Yuzi Chahal : युजवेंद्र चहलने वापरली ई - सिगरेट ; विमानातला 'तो' व्हिडिओ होतोयं व्हायरल...

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्पयात आहे. हंगाम संपायला आता काही सामने बाकी आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून रोज

कौतुकास्पद ! पेपर विक्रेत्याच्या मुलीने मिळविले शंभर टक्के, शिकवणी न लावता श्रावणीने गाठले यशाचे शिखर

नाशिक :  मनात जिद्द असेल तर आयुष्यातील कठोर प्रसंगांवरही मात करता येते. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. आर्थिक

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

मिरा भाईंदरमधील २५४ एकर जमिनीसाठी; राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

मुंबई : मिरा भाईंदर येथील मिठागराची तब्बल २५४ एकर मोक्याची शासकीय जमीन एका खासगी कंपनीच्या घशात जाण्याची