संत एकनाथ

देवासी तो मुख्य कीर्तनाची गोडी
देवासी तो मुख्य कीर्तनाची गोडी
देवासी तो मुख्य कीर्तनाची गोडी
म्हणोनिया उडी घाली स्वये ॥
नावडे तया आणिक संकल्प।
कीर्तनी विकल्प करिता क्षोभे ॥
साबडे भाळेभोळे नाचताती रंगी।
प्रेम ते अंगी देवाचिये ॥ મો
एका जनार्दनी धाने लवलाहे ।
न तो काही पाहे आपणाते ।


ईश्वराची प्राप्ती व्हावी, त्याची कृपा व्हावी म्हणून आराधनेची जी विविध माध्यमे आहेत, त्यात कीर्तन' हे महत्त्वाचे माध्यम आहे. देवालाही 'कीर्तन' मनापासून प्रिय आहे. 'कीर्तन' म्हणजे काय? कीर्तन म्हणजे नामस्मरण वा नामाचा गजर, परमेश्वराचे गुणवर्णन. करावे कीर्तन। मुखी गावे हरिचे गुण ॥ असे संत तुकारामांनी कीर्तनाविषयी म्हटलं आहे. कीर्तनाचं महत्त्व सांगताना ते म्हणतात, 'नामसंकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ॥ संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीला 'धर्मकर्तिन' असे म्हटले आहे.


संतांच्या दृष्टीने 'कीर्तन' ही श्रेष्ठ भक्ती होती. कीर्तनामध्ये गायन, वादन, अभ्यासपूर्ण वक्तृत्व, विनोद अशा अनेक गोष्टी असल्यामुळे, त्यातील भक्तिरंगामुळे ते जनसामान्यांच्या मनात रुजले. कीर्तन हे जनजागृती आणि सामाजिक प्रबोधनाचे मोठे साधन आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांना स्वातंत्र्ययुद्धाची प्रेरणा देण्यासाठी कीर्तनकारांनी लोकप्रबोधनाचे मोठे काम केले. संत नामदेवांनी "नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी॥" अशी प्रतिज्ञा केली आणि कीर्तनांद्वारे ती पूर्ण केली.


या अभंगात संत एकनाथ म्हणतात, देवांना कीर्तनाची मोठी आवड असेल तिथं परमेश्वर स्वतः उडी घेऊन त्यात सामील होतो. भक्ताचे संकट निवारण करतो. देवांना कीर्तनाशिवाय भक्तांचे इतर संकल्प आवडत नाहीत. कीर्तनाच्या महतीविषयी, हरिकीर्तनाविषयी कोणी विपरीत बोलल्यास, त्यात अडथळे आणल्यास देवांचा क्षोभ होतो. सरळ, साधे भक्त जेव्हा कीर्तनरंगात आनंदाने नाचूू लागतात. तेव्हा देवालाही प्रेमाचे भरते येते. भक्तांच्या मनात प्रेमभावाचे तरंग उचंबळून येतात.


वारकरी कीर्तन सामूहिक स्वरूपाचे असते. मृदंगवादक, विणेकरी, टाळकरी हे कीर्तनकारांसोबत असतात, भजन, गायन, वादन, निरूपण, दृष्टान्त याद्वारा निरुपणासाठी निवडलेला अभंगाचा भावार्थ उलगडून सांगितला जातो.
संतांनी रुजविलेली कीर्तन परंपरा हा मराठी संस्कृतीचा वैभवशाली ठेवा आहे. वारकरी भक्तिरंगाचा हा प्रभावी आणि गौरवाशाली अाविष्कार आहे.

Comments
Add Comment

क्रियमाण

जीवन संगीत-सद्गुरू वामनराव पै   क्रियमाण म्हणजे नेमके काय? असा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असणार. याचे अगदी

घे जवळी, घे जवळी...

ऋतुराज-ऋतुजा केळकर   “मैने बिगाडा हर काम अपना तुने सावरा हर काम मेरा सांचा नाम तेरा...” साजवेळी हे गीत सहजच ओठी

कल करे सो आज कर

आत्मज्ञान-प्राची परचुरे-वैद्य   काही जणांना सवय असते आजचे काम उद्या किंवा नंतर करण्याची, त्याचवेळेला ते काम

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा...”

भारतीय संत-डॉ. अनुराधा कुलकर्णी   अरुणोदय होण्यापूर्वीच सेना उठले. आज महाराजांना सकाळी प्रवासाला निघायचे होते.

जीवनप्रवास सुखाचा

जीवन संगीत-सद्गुरू वामनराव पै आपण प्रबोधनाचा जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे संचित ते नशीब. या विषयाशी संबंधित

कपटफुलांच्या रानगंधात

ऋतुराज-ऋतुजा केळकर एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक...” दुरून येणारे आशा दीदींचे