Nashik Accident : भरधाव वाहनाची मागून दुचकीला जोरदार धडक! नवरा बायकोचा जागीच मृत्यु; थरारक अपघात

नाशिक : महाराष्ट्रामध्ये वाहनांच्या अपघातांची मालीका सुरुच.. काल मंगळवारी साक्री-शिर्डी राष्टिय महामार्गावर भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास ढोलबारे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात नवापूर तालुक्यातील आमलीपाडा (जि. नंदुरबार) येथील नवरा बायकोचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संदीप दासू गावित (वय ३५) व त्यांची पत्नी आशा संदीप गावित (वय ३२) अशी मृतांची नावे आहेत. समोर आलेल्या माहितीतून समजलं आहे.. हे दांपत्य नवापूरहून येवला येथे आपल्या मुलांना भेटण्यासाठी दुचाकीवरून प्रवास करत होते. सकाळी ७.३० सुमारास ढोलबारे गावाजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली.


या धडकेनंतर दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती समोरून येणाऱ्या पिकअप वाहनावर आदळली. या भीषण अपघातात संदीप आणि आशा गावित यांचा जागीच मृत्यू झाला. क्षणात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दोन चिमुकल्या मुलांचे आई-वडील कायमचे हिरावले गेले आहेत.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. साक्री–शिर्डी महामार्गावरील अपूर्ण काम, दिशादर्शक फलकांचा अभाव, दुभाजक नसणे आणि धोकादायक वळणे यामुळेच अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप स्थानिकांनी केले आहेत..


Comments
Add Comment

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ दोन ड्रोन कोसळले, एका भारतीयासह ४ जण जखमी

अबू धाबी : इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. दुबई आंतरराष्ट्रीय

शेतीचा कणा असलेल्या महिलांना मिळणार हक्काचा सातबारा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून विशेष अनुदानाची ग्वाही

महिला शेतकरी अधिकार कायद्याच्या अभ्यासासाठी कृतीगट तयार करावा - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई : ग्रामीण

चंद्रपुरात कोळसा प्रदूषणाला बसणार चाप; विधानपरिषदेत मंत्री शंभूराज देसाईंकडून 'चंद्रपूर मॉडेल'ची घोषणा!

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील कोळसा खाणींमुळे होणारे प्रदूषण आणि वाहतुकीच्या समस्यांबाबत

हैद्राबादहून निघालेल्या विमानाचा अपघात; चाक निखळले अन् १३३ जणांचे प्राण...

फुकेत : हैद्राबादहून थायलंडकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला लँडिंगदरम्यान गंभीर तांत्रिक बिघाड

समर्थ ई-मोबिलिटीकडून भारतात डिझाइन करण्‍यात आलेला १०० टक्‍के स्‍वदेशी फुल-स्‍टॅक ईव्‍ही टेक्‍नॉलॉजी प्‍लॅटफॉर्म लाँच

अहमदाबाद : भारताच्‍या इलेक्ट्रिक गतीशीलता प्रवासामध्‍ये महत्त्वपूर्ण टप्‍पा गाठत समर्थ ई-मोबिलिटी प्रा. लि. या

चैत्र चाहूल २०२६ चे 'ध्यास' आणि रंगकर्मी सन्मान

मुंबई : गेली दोन दशके गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर “चैत्र चाहूल” हा मराठी संस्कृती आणि मराठी भाषेला वाहिलेला