जळगावात महायुतीचे शक्ती प्रदर्शन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रॅलीला प्रचंड गर्दी


जळगाव : जळगाव शहरात मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महापालिका प्रचारार्थ आयोजित रोड शोला शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने महायुतीने शहरात शक्ती प्रदर्शन केले. सायंकाळी महापालिका निवडणुक प्रचारार्थ मुख्यमंत्री यांचे धुळयाहून आगमन जळगाव शहरात झाले. मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची भाजपाने जोरदार तयारी केली. जिल्हाभरातून पदाधिकारी, निवडून आलेले नगराध्यक्ष, नगरसेवक शहरात भाजपा कार्यालयात दाखल झाले, रोड शोमध्ये दोन रथांचे आयोजन करण्यात आले. त्यात एका रथात सर्व निवडून आलेले नगराध्यक्ष, नगरसेवक तर, दुसऱ्या रथात मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री गुलाबराव पाटील,संजय सावकारे, गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, अमोल जावळे, चंद्रकांत सोनवणे, अमोल पाटील भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी होते. या रोड शोमध्ये दहा हजारांवर पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले असल्याचा दावा केला आहे.


जळगाव शहराच्या विकासासाठी मदत करणार


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना काँग्रेसच्या काळात शहर विकासासाठी ५० कोटी देखील मिळाले नव्हते असे सांगून जळगाव शहराच्या विकासासाठी आम्ही हजार कोटी दिले. आतापर्यंत ८६३ कोटींची विकासकामे दिली. यापुढे शहराच्या विकासासाठी पैसा देत राहू असे आश्वासन दिले. त्याचबरोबर पुढील पाच वर्षांत जळगाव स्मार्ट सिटी करण्याचा संकेत दिला. जळगावात उदयोग यावेत म्हणून जळगाव एमआयडीसीला डी दर्जा देण्यात आला आहे, यामुळे येथे सबसिडी मिळत असल्याने शहरात आता नवे उद्योग येतील, असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले असून या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

Mahabaleshwar Heavy Rainfall : महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नावली गावातील काही भाग खचला

- प्रशासनाने केले नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर; गावाला कोणताही धोका नाही - नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू

पंढरपुरात मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भक्तनिवासाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पंढरपूर : पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्यावतीने उभारण्यात आलेल्या धर्मशाळा-भक्तनिवासाच्या

Onion Farmers : केंद्र सरकारकडून कांदा उत्पादकांना दिलासा

सरकारी खरेदीदरात १३ टक्क्यांनी वाढ; प्रति क्विंटल २ हजार १२५ रुपये दर निश्चित मुंबई : कांदा उत्पादक

Ratnagiri News : धक्कादायक! दिड वर्षांच्या चिमुकल्यासह आईने मारली मांडवी एक्सप्रेसमधून उडी

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक (Ratnagiri News) अत्यंत धक्कादायक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

Jalna Bus Accident : जालना-बीड महामार्गावर भीषण अपघात! दोन एसटी बसची समोरासमोर धडक; चालकांसहअनेक प्रवासी जखमी

जालना : जालना-बीड महामार्गावर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. अंबड तालुक्यातील शहापूरजवळ गल्हाटी नदीच्या पुलावर