पुण्यात IT इंजिनिअरने वॅाशरुम मध्ये जाऊन घेतला गळफास.. सिक्युरिटी गार्ड आतलं दृश्य पाहून हादरला

पुणे : कामाचा त्रास व आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे बहुतांश जणांच्या आत्महत्या केल्याच्या घटना दिवसेंदिवस समोर येत असतात. तसंच काही पुण्यामध्येही घडलं आहे.पुण्यामधील हिंजवडी येथील आयटी पार्कमध्ये आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे एका तरुण ट्रेनिंग आयटी इंजिनिअरने केल्याचे सांगितले आहे.. सुजय विनोद ओसवाल (वय २४) असं मृत तरुणाचं नाव आहे



नक्की घडलं काय ?


पुण्यात तरुणाची आत्महत्या करण्याची घटना उघडकीस झाले आहे. हा तरुण पुण्यातील हिंजवडी येथील आयटी पार्क मध्ये नाईट शिफ्टवर कार्यरत होता.तो कामादरम्यान वॅाशरुमला गेला अ्न मोबाईलच्या चार्जर केबलच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.. मात्र बराच वेळ परत न आल्याने संशय निर्माण झाला त्यादरम्यान गार्ड फेरफटका मारत असताना वॅाशरुम मध्ये सुजयने आत्महत्या केल्याच पाहिलं..


आत्महत्येपूर्वी त्याने कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही. तपासामध्ये हे समोर आले आहे की सुजयला आर्थिक अडचणी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे...ऑनलाईन सट्टा आणि बेंटीगमुळे त्याच्यावर भरपूर प्रमाणात कर्ज असल्याचे ही समोर आले आहे याच मानसिक तणावातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आत्महत्येपूर्वी त्याने कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही. मात्र, आर्थिक अडचणींमुळे आपण आत्महत्या करत असल्याचा मेसेज त्याने कुटुंबियांना पाठवला होता, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे