शनिदेवाच्या दर्शनाआधीच काळाने डाव साधला; मिनी बसच्या धडकेत तीन मित्रांचा जागीच मृत्यू

अहिल्यानगर : इगतपूरीजवळील गिरणारे येथील काही तरुण पालखी घेऊन शिर्डीला गेले होते. त्यापैकी काही तरुण शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी रिक्षाने निघाले होते. मात्र, दर्शनाआधीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. राहुरीहून भरधाव वेगात येणाऱ्या मिनी बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर मिनी बस रस्त्याच्या कडेला उलटली.


राहुरी–शनीशिंगणापूर मार्गावर उंबेरे गावाजवळ भरधाव मिनी बस आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात इगतपुरी तालुक्यातील गिरणारे गावातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, इगतपूरीजवळील गिरणारे येथील काही तरुण पालखी घेऊन शिर्डीला गेले होते. त्यापैकी काही तरुण शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी रिक्षाने निघाले होते. मात्र, दर्शनाआधीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. राहुरीहून भरधाव वेगात येणाऱ्या मिनी बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर मिनी बस रस्त्याच्या कडेला उलटली.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र, रिक्षातील तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या अपघातात दीपक जगन डावखर (२२), आकाश मनोहर डावखर (२२) आणि दीपक विजय जाधव (२२) या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिघेही नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी तालुक्यातील गिरणारे गावचे रहिवासी होते.


दरम्यान, या अपघातात रूपेश गणेश भगत (१९) आणि रोशन गंगाधर डावखरे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला?, मिनी बसचा वेग किती होता? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन