Imtiaz Jalil vehicle Attack : मोठी बातमी : भर रस्त्यात इम्तियाज जलील यांच्या गाडीवर सपासप वार केले अन्... थोडक्यात बचावले; संभाजीनगर हादरले

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाहनावर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. विशेष म्हणजे, हा हल्ला केवळ दगडफेक नव्हता, तर जलील यांच्या वाहनावर धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, या घटनेमुळे शहरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.





'नव्यां'ना संधी अन् 'जुन्यां'ना केराची टोपली?


मिळालेल्या माहितीनुसार, इम्तियाज जलील हे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचार दौरा करत होते. मात्र, बायजीपुरा परिसरात पोहोचताच त्यांच्या पक्षातीलच नाराज कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला. यावेळी कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी जलील यांच्या गाडीवर हल्ला चढवला. काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, गाडीच्या काचा फोडण्यासोबतच धारदार हत्यारांचा वापर करून जलील यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला, मात्र सुदैवाने ते थोडक्यात बचावले आहेत. या हल्ल्यामागे पक्षांतर्गत असलेली मोठी नाराजी असल्याचे बोलले जात आहे. महापालिका निवडणुकीत अनेक वर्षांपासून पक्षासाठी राबणाऱ्या जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून, ऐनवेळी पक्षात आलेल्या नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. "पक्षासाठी रक्त आटवणाऱ्यांना डावलले जात असेल तर आम्ही शांत बसणार नाही," अशा भावना यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.



पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. हल्ल्याच्या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज करून गर्दी पांगवण्यात आली आहे. सध्या जलील यांच्या ताफ्याभोवती मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली असून, या हल्ल्याचा सूत्रधार कोण? याचा तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली