मुंबईतील सात प्रभागांमध्ये युती आणि आघाडीचे उमेदवारच आमने-सामने

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा महायुती तसेच उबाठा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप)यांची आघाडी असली तरी मुंबईतील सात प्रभागांमध्ये ही महायुती किंवा आघाडी दिसून येत नाही. तर या चार प्रभागांमध्ये हे सर्व पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असून यात कुणाचा बळी जातो याकडे सर्वांचे लक्ष आहे.


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे, उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शपची युती झाली असली तरी प्रत्यक्षात प्रभाग क्रमांक १४३, प्रभाग क्रमांक १७५ यामध्ये मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शप यांचे उमेदवारी प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर ठाकले गेले आहेत. त्यामुळे या दोन प्रभागांमध्ये मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.


तर प्रभाग क्रमांक ३४, प्रभाग क्रमांक १७३ आणि प्रभाग क्रमांक २२५मध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना अशी लढत पहायला मिळणार आहे.


या तिन्ही प्रभागांमध्ये भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार एकमेकांसमोर ठाकले गेले आहेत. तर प्रभाग क्रमांक १७९मध्ये शिवसेना विरुद्ध रिपाइं आठवले यांच्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे, तसेच याच प्रभागांत उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शपच्या उमेदवारांनीही स्वतंत्र अर्ज भरले आहे. तर प्रभाग १५०मध्ये शिवसेना विरुद्ध रिपाइं आठवले यांच्या पक्षाचे उमेदवार आमने-सामने आहेत.


महायुती आणि आघाडीचे उमेदवारच असलेले प्रभाग


प्रभाग क्रमांक ३४


सॅम्युअल डेनिस भाजप विजय महाडिक, शिवसेना


प्रभाग क्रमांक १४३


प्रांजल प्रशांत राणे, मनसे रेहमत खान, राष्ट्रवादी काँग्रेस (शप)


प्रभाग क्रमांक १५०


वनिता कोकरे, भाजप अंसारी आयेशा अली (रिपाइं आठवले)


प्रभाग क्रमांक १७५


अर्चना कासले, मनसे आरती राजेंद्र देवेंद्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शप)


प्रभाग क्रमांक १७९


सरदार शमाबी यासिन, शिवसेना भारती पांडे, (रिपाइं आठवले)


प्रभाग क्रमांक १७९


दीपाली सचिन खेडेकर, उबाठा भारती पांडे, राष्ट्रवादी काँग्रेस, शप


प्रभाग क्रमांक १७३


पूजा रामदास कांबळे, शिवसेना शिल्पा केळुसकर, भाजप


प्रभाग क्रमांक २२५


हर्षिता नार्वेकर, भाजप सुजाता सानप, शिवसेना

Comments
Add Comment

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मॉन्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुविधांसाठी दिघी जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने मार्गी लावा

मुंबई, : रायगड(raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमार जेट्टी प्रकल्प तसेच परिसरातील गाळ

अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी

कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना मोठा दिलासा मुंबई दि.  २५ : एप्रिल व मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर कारवाईची मागणी

शिवसेना महिला सेनेकडून मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मुंबई, दि. २५ जून