मुस्तफिजूर रहमानसाठी संपूर्ण बांगलादेश वेठीला!

आयपीएल प्रसारणावरील बंदीमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये संताप


नवी दिल्ली : बीसीसीआयने अलीकडेच आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सला बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान याला संघातून मुक्त करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर लगेचच केकेआरने मुस्तफिझूरला आपल्या संघातून बाहेर काढले. या निर्णयामुळे बांगलादेशमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, आता त्यांनी मोठे पाऊल उचलले आहे.


बांगलादेश सरकारने जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग इंडियन प्रीमियर लीगच्या प्रसारणावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. या निर्णयामुळे बांगलादेशमधील आयपीएलप्रेमी क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात अबूधाबी येथे झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये केकेआरने मुस्तफिझूर रहमानला ९.२० कोटी रुपयांना विकत घेतले होते. बांगलादेशच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने ५ जानेवारी रोजी देशातील सर्व टेलिव्हिजन चॅनल्सना आयपीएलचे प्रसारण तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले. हा आदेश अधिकृत पत्राद्वारे देण्यात आला आहे.


या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, बीसीसीआयने कोणतेही ठोस कारण न देता बांगलादेशचा स्टार खेळाडू मुस्तफिझूर रहमान याला आगामी आयपीएल हंगामातून बाहेर काढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकारामुळे बांगलादेशच्या जनतेमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत आयपीएलचे सर्व सामने आणि संबंधित कार्यक्रमांचे प्रसारण त्वरित बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


भारतात जाणार नाही बांगलादेश संघ


यापूर्वीच बांगलादेशने टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतात न जाण्याचा अधिकृत निर्णय घेतला आहे. यामुळे दोन्ही देशांतील संबंध आणखी ताणले गेले आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे पत्र लिहून बांगलादेशचे सर्व सामने भारताऐवजी श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली आहे. सध्या नियोजनानुसार, बांगलादेशचे पहिल्या तीन लीग सामने कोलकात्यात तर चौथा सामना मुंबईत होणार आहे.


राजकीय तणावही कारणीभूत


उल्लेखनीय बाब म्हणजे, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून हटवण्यात आल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध अधिकच तणावपूर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सरकारविरोधी आंदोलनांनंतर शेख हसीना भारतात आल्या होत्या. त्यानंतर बांगलादेशमध्ये भारतविरोधी भावना आणि आंदोलनांना उधाण आले आहे.


Comments
Add Comment

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.