Nitesh Rane : "उद्धव ठाकरे नाही, तर ते 'उद्धव वाकरे'...नितेश राणेंचा घणाघात!

अमित साटम यांच्या आडनावावरून केलेल्या विधानामुळे राणे आक्रमक


मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या आडनावावरून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी या वादात उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला असून, त्यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. "ज्यांनी जिहादी मानसिकतेसमोर गुडघे टेकले आहेत, अशांचा कणा आता मोडला असून ते 'ठाकरे' राहिले नसून 'वाकरे' झाले आहेत," अशा शब्दांत राणेंनी प्रहार केला आहे.



कोकणी अस्मितेचा अवमान खपवून घेणार नाही!




उद्धव ठाकरेंनी अमित साटम यांच्या आडनावावर केलेल्या टिप्पणीचा समाचार घेताना नितेश राणे म्हणाले की, "नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी आपल्या अहंकारातून एका प्रामाणिक लोकप्रतिनिधीच्या आडनावाची थट्टा उडवली आहे. कोकणामध्ये साटम, परब, सावंत, राणे अशी आडनावे मोठ्या स्वाभिमानाने लावली जातात. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या आडनावाचा अपमान करता, तेव्हा तुम्ही केवळ त्या व्यक्तीला नाही, तर संपूर्ण कोकणच्या मातीला आणि तिथल्या संस्कृतीला आव्हान देता. ही कोकणी अस्मिता आहे, जी अशा प्रकारचा अपमान कधीही सहन करणार नाही."



'उद्धव वाकरे' शब्दाचा वापर करत टोकदार टीका


यावेळी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख सातत्याने 'उद्धव वाकरे' असा केला. "उद्धव ठाकरेंना आता सत्तेसाठी वाकण्याची सवय झाली आहे. हिंदुत्वाचा विचार सोडून ज्यांनी अल्पसंख्याकांच्या मतांसाठी तडजोड केली, त्यांचा कणा आता ताठ राहिला नाही. त्यामुळे ते आता 'वाकरे' झाले आहेत. आमच्या कोकणी माणसाच्या आडनावांची खिल्ली उडवणाऱ्या या वृत्तीला आता कोकणचा वचक आणि हिसका काय असतो, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे," असे राणे यांनी ठणकावून सांगितले.



मतपेटीतून 'हिशोब' चुकता करण्याचा इशारा


मुंबईत राहणाऱ्या कोकणी बांधवांना आवाहन करताना नितेश राणे म्हणाले की, "हा अपमान विसरू नका. मुंबईच्या विकासामध्ये आणि कोकणच्या जडणघडणीत साटम आणि इतर कोकणी कुटुंबांचे मोठे योगदान आहे. अमित साटम यांच्या पाठीशी संपूर्ण कोकणी जनता खंबीरपणे उभी आहे. या अपमानाचा बदला आता मतपेटीतून घेतला जाईल. येणाऱ्या काळात उद्धव ठाकरेंना कोकणची जनता त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही."

Comments
Add Comment

बारव संवर्धनाला प्राधान्य देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा; मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक बारवांचे जतन व संवर्धन करण्यास पुरातत्व विभागाने प्राधान्य द्यावे, यासाठी कृती

नाशिकमधील 'कॉर्पोरेट जिहाद'नंतर राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये

 सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये होणार झाडाझडती; महिलांच्या सुरक्षेसाठी ‘पॉश’ कायद्याची कठोर अंमलबजावणी मुंबई

Amruta Fadanvis : रेड कार्पेटची वाट पाहता येईल, पण माझा देश नेहमीच प्रथम!" पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर अमृता फडणवीसांचा 'कान्स' दौरा रद्द

मुंबई : सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, देशातील जनतेने अनावश्यक परदेश वाऱ्या टाळाव्यात, इंधनाची

Amruta Fadnavis: इंधन बचतीसाठी अमृता फडणवीस यांचा पुढाकार

 कान्स फिल्म फेस्टिव्हलचा दौरा रद्द; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद मुंबई : पंतप्रधान

ओला, उबर आणि रॅपिडोचे ॲप प्ले-स्टोअरवरून हटवा

परिवहन विभागाचे महाराष्ट्र सायबर विभागाला आदेश; बेकायदेशीर बाईक टॅक्सींवर आतापर्यंतची सर्वात मोठी

शहरांमधील बांधकाम आणि पाडकामाच्या ढिगाऱ्यांवर आता सरकारचा 'वॉच'!

 राज्यस्तरीय सनियंत्रण समिती स्थापन; नियम मोडणाऱ्या विकासकांवर फौजदारी कारवाई मुंबई : इमारतींच्या