मनसेचे नाराज संतोष धुरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला - मंत्री नितेश राणे यांनी घडवून आणली भेट

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंच्या मनसे मोठा धक्का बसला आहे. मनसेचे कट्टर नेते आणि वरळी विभागातील प्रमुख कार्यकर्ते संतोष धुरी यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मंत्री नितेश राणे यांनी ही भेट घडवून आणली. प्रभाग क्रमांक १९४ मधून तिकीट न मिळाल्याने धुरी गेल्या काही दिवसांपासून नाराज होते.


प्रभाग क्रमांक १९२ आणि १९४ या दोन जागांवर उबाठा आणि मनसेत तिढा होता. अखेर या वादावर तोडगा काढत प्रभाग १९२ मनसेकडे राहिला, तर प्रभाग १९४ उबाठाला सोडण्यात आला. मात्र, प्रभाग क्रमांक १९४ मधून माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांचा या क्षेत्रात दीर्घकाळ सक्रिय सहभाग आणि प्रभाव होता. परंतु जागावाटपात हा प्रभाग उबाठाला गेल्याने संतोष धुरी यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली. या निर्णयानंतर संतोष धुरी काही काळ नॉट रिचेबल झाले होते.

Comments
Add Comment

Amit Shah : एफसीआरए विधेयकावर अमित शाह बोलण्याची शक्यता

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील सलग गदारोळ आणि कामकाज थांबल्याचा तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारने

Women's Reservation Bill : परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयकांसाठी विशेष अधिवेशन घेण्याची केंद्र सरकारची तयारी; किरेन रिजिजू आणि राहुल गांधी यांची भेट

नवी दिल्ली : परिसीमन (Delimitation Bill) आणि महिला आरक्षणाशी (Women's Reservation Bill) संबंधित महत्त्वाच्या घटनादुरुस्ती विधेयकांवर केंद्र

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

नवी दिल्ली : बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत

Waqf Cases : वक्फ नोंदींच्या वादग्रस्त प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष बेंच

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा मुंबई : राज्यात

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम