ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास


ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल आणि शहराच्या कारभारावर पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येईल, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज सायंकाळी ठाणे शहरात प्रचार रॅली काढण्यात आली. जांभळी नाका येथून सुरू झालेल्या या रॅलीदरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत जनतेने महायुतीवर दाखवलेला विश्वास आता महापालिका निवडणुकीतही कायम राहील, असे ते म्हणाले.


राज्यातील विरोधकांकडे ठोस मुद्दे नसून निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या आघाड्या जनतेला स्वीकारार्ह नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी त्याचा कोणताही राजकीय परिणाम होणार नसल्याचे सांगत, ठाणेकरांनी विकास, स्थैर्य आणि विश्वासाला प्राधान्य देत महायुतीलाच कौल दिला असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांमध्येही महायुती सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचे आवाहन केले. रॅलीदरम्यान मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग दिसून आला. महिलांचा हा उत्साह सरकारच्या विविध योजनांवरचा विश्वास दर्शवतो, असे शिंदे यांनी सांगितले.


या प्रचार रॅलीत खासदार नरेश म्हस्के, भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅली राबोडी शंकर रोड, चेंदणी कोळीवाडा, टेंभी नाका, चंदनवाडी नाका, सिद्धेश्वर तलाव परिसर, लोकमान्य नगर, भीमनगर, मानपाडा आणि मनोरमा नगर या भागांतून मार्गस्थ झाली. सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत रॅली निघाल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये