भटक्या कुत्र्यांवरील कारवाईविरोधात मुंबईत ‘करा किंवा मरा’ आंदोलन

मुंबई : भटक्या कुत्र्यांवरील कारवाईच्या विरोधात रविवारी, (४ जानेवारी) देशभरात पुकारण्यात आलेल्या ‘करा किंवा मरा’ आंदोलनात मुंबईतील प्राणीप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अंधेरी परिसरात सुमारे दोन किलोमीटर लांबीची रॅली काढण्यात आली असून, हजारो प्राणीप्रेमी, स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्ते या निषेधात सहभागी झाले होते. यावेळी “प्राण्यांवर क्रूरता थांबवा”, “मानवी आणि प्राणी सहअस्तित्व हवे” अशा घोषणा देण्यात आल्या.


आंदोलनकर्त्यांनी येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला मतदान न करण्याचा इशारा दिला आहे. सरकार आणि प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तसेच प्राणी आणि प्राणीप्रेमींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सुरूच राहिल्या, तर स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करून निवडणूक लढवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.


या आंदोलनात सहभागी झालेले प्राणी हक्क सल्लागार रोशन पाठक यांनी सांगितले की, देशभरातील प्राणीप्रेमींनी लोकशाही मार्गाने आपला आवाज बुलंद करण्याचा निर्णय घेतला आहे. “जोपर्यंत प्राण्यांसाठी योग्य कायदे, मानवी धोरणे आणि प्रभावी अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही,” असे ते म्हणाले.या आंदोलनामागील वादाचे मूळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाशी संबंधित आहे. न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना उचलून नियुक्त आश्रयस्थानांमध्ये नेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, प्राणीप्रेमी या निर्णयाला विरोध करत असून, नसबंदी व लसीकरणाचे कार्यक्रम प्रभावीपणे राबवले असते तर मानव आणि प्राणी शांततेत एकत्र राहू शकले असते, असे त्यांचे म्हणणे आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनंतरही स्थानिक प्रशासनाने प्राण्यांसाठी अधिकृत फीडिंग स्पॉट्स उपलब्ध करून दिलेले नाहीत. त्यामुळे प्राणी खाऊ घालणाऱ्या नागरिकांना सतत त्रास व धमक्या दिल्या जात आहेत. कायद्याने परवानगी असूनही, फीडर्स व रेस्क्यू करणाऱ्यांना बेकायदेशीरपणे अडवले जाते व अपमानास्पद वागणूक दिली जाते, असे पाठक यांनी सांगितले.

Comments
Add Comment

BMC Park : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! महापालिकेची सर्व उद्याने उद्या बंद राहणार; जोरदार वारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा! २९१ ठिकाणी झाडे कोसळली, २२ ठिकाणी भिंती-घरांचे नुकसान; पुढील २४ तास अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत सोमवारी (६ जुलै) दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शहरातील जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

Girish Mahajan : अतिवृष्टीमुळे घडलेल्या सर्व घटनांची चौकशी होणार, नागरिकांनी सतर्क राहावे : मंत्री गिरीष महाजन

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार आणि अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इमारतींचे

Mumbai heavy rain : मुंबईत अवघ्या सहा दिवसांत १० जणांचा मृत्यू; पाऊस, झाडे कोसळणे आणि घर दुर्घटनांनी वाढवली चिंता

मुंबई : यंदाच्या मान्सूनमध्ये मुंबईत पावसामुळे घडणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाण वाढत असून, ३० जून ते ५ जुलै या अवघ्या

Mumbai Rain Alert : गरज असेल तरच घराबाहेर पडा!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; दुपारनंतर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता मुंबई : "गेल्या काही तासांपासून

Kashedi landslide: मुसळधार पावसाचा फटका; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, प्रशासनाकडून बचावकार्य सुरू

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यासह अनेक भागांतील रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम