मागील तीन महापालिका निवडणुकांच्या तुलनेत यंदा उमेदवारांची संख्या घटली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर अंतिम उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्षांसह अपक्ष अशाप्रकारे एकूण १७०० उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.मात्र, उमेदवारांची ही आकडेवारी मागील तीन सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत सर्वांत कमी नोंदवली गेली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत युती, महायुती आणि आघाडी झाल्याने यंदा उमेदवारांच संख्या तसेच अपक्षांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे.


मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंदा १७०० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, मात्र मागील सन २०१७मध्ये २२१७ उमेदवार, सन २०१२मध्ये २२३२ उमेदवार आणि सन २००७च्या सार्वत्रिक निवडणुकीत २३७६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. मागील चार सार्वत्रिक निवडणुकांचा अंदाज घेतल्यास यंदाच्या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांचा आकडा हा कमी होण्यामागे युती, महायुती, महाविकास आघाडी हेच प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना आणि भाजपा महायुती, उबाठा आणि मनसे युती, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी यामुळे तसेच यंदा निवडणूक खर्चाची मर्यादा १५ लाखांपर्यंत नेली असली तरी आता निवडणूक लढवणे पहिल्यासारखे सोपे नसल्याने सुरुवातीला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणे आणि मगे घेणे या तुलनेत अपक्षांनी यंदा मोठ्याप्रमाणात अर्ज न भरल्यामुळे हे उमेदवारांचे प्रमाण घटल्याचे बोलले जात आहे.


सन २०१७च्या निवडणुकीत यापूर्वी युतीमध्ये लढणारे भाजपा आणि शिवसेना प्रथमच स्वतंत्र तथा स्वबळावर लढले होते. त्यामुळे मागील निवडणुकीतील अपक्षांनी तसेच बंडखोरांनी अर्ज मागे घेतल्यानंतर २२७५ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले होते. त्याआधी युती आणि विकास आघाडीसह इत पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढत असल्याने उमेदवारांची संख्या वाढत होती. यंदा मनसे आणि उबाठा जे २२७ जागांवर स्वतंत्र लढतात, त्यांची युती झाल्याने त्यांच्या उमेदवारांची संख्या, घटली तसेच वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडी झाल्याने सर्वच जागा लढवणाऱ्या या पक्षाच्या जागा काही प्रमाणात विभागल्या गेल्या.तसेच भाजपाच्या बाबतीत हेच झाले आहे. शिवसेना पक्ष यंदा प्रथमच महापालिका निवडणूक लढवत आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारांची संख्या अधिक वाढली असली तरी युती आणि आघाडी तसेच महायुतीमध्ये लढल्याने यंदा उमेदवारांची संख्या मोठ्याप्रमाणात घटल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.



सार्वत्रिक निवडणुकीतील एकूण उमेदवाराची संख्या


सन २००७ : २३७६


सन २०१२ : २२३२


सन २०१७ : २२७५


सन २०२६ : १७००

Comments
Add Comment

Amit Shah : गांधीनगरमध्ये घुमला शिवरायांचा जयघोष! गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरमध्ये 'महाराष्ट्र समाज' तर्फे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी

Mumbai: महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना प्रत्येकी ११ रुपयांचा दंड भरावा लागणार; हायकोर्टाचा निर्णय

मुंबई: अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले असतानाही त्याची अंमलबजावणी न केल्याने उच्च न्यायालयाने दोन

Nations First Humanity Ai City : भारताची एआय झेप! बंगळुरूमध्ये साकारणार देशातील पहिली 'Humanity AI City', केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव काय म्हणाले ?

नवी दिल्ली : भारताला जागतिक 'एआय हब' बनवण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली असून, देशातील एआय इन्फ्रास्ट्रक्चर अधिक

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला मतदान केंद्रीय आयोगाकडून घोषणा; महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश

मुंबई : देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी

विवेक भीमनवार यांनी घेतली एमपीएससीच्या अध्यक्षपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी विवेक

Grampanchayat Election: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजणार; 'या' तारखांना निवडणूक होण्याची शक्यता

मुंबई: महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची लगबग सुरू