उमेदवारांनी साधला रविवारचा मुहूर्त; भेटीगाठी, देवदर्शन, प्रचार फेऱ्यांनी वातावरण निवडणूकमय

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या २२७ प्रभागांतील उमेदवारी अंतिम झाल्यानंतर पहिल्या रविवारी उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींना वेग दिला. सकाळी ७वाजल्यापासूनच उमेदवारांनी मतदारांना गाठणे सुरू केले. त्यात प्रामुख्याने सोसायट्यांच्या बैठका व प्रचार फेऱ्यांचा समावेश होता. प्रचारासाठी मोजकेच दिवस असल्याने रविवारी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची तारेवरची कसरत सुरू होती. प्रमुख राजकीय पक्षांकडून मतदारसंघात आता नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली आहे. त्याद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. प्रत्येक प्रभागात प्रमुख पक्षाच्या उमेदवारांकडून प्रचार कार्यालयांच्या उद्घाटनाचा धडाकाही सुरू आहे. रविवार सार्थकी लावण्यासाठी बोरीवली, चारकोप, मालाड, कांदिवली, मागाठाणे आणि दहिसर या उत्तर मुंबईतील मतदारसंघांतील उमेदवारांनी दिवसभर जास्तीत जास्त मतदारांच्या भेटी घेतल्या. काही उमेदवारांनी प्रचार फेऱ्यांऐवजी वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला. सोसायट्यांमधील एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी उमेदवार सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत फिरत होते. त्यानंतर पुन्हा सायंकाळी ५ वाजता प्रचाराला सुरुवात होऊन रात्री १० वाजेपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते प्रचारात होते.

Comments
Add Comment

घाटकोपरमधील मराठी तरुणीला कंपनीतल्या लोकांनी दिला त्रास; काम सोडल्यावरही..., अखेर मनसेने दाखवला इंगा

मुंबई: मराठी माणसांना प्रवासादरम्यान किंवा एखाद्या कंपनीच्या कार्यालयात परप्रांतीय लोकांनी त्रास दिल्यास

खासदारकीसाठी संजय राऊत लवकरच काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करतील - नवनाथ बन

- औरंगजेब फॅन क्लब चालवणा-या संजय राऊतांना हिंदुत्वाच्या बाता मारत भाजपावर टीका करण्याचा अधिकार

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना श्रद्धांजली

मुंबई: ज्यांच्या व्यासंग आणि संशोधनपूर्ण मांडणीमुळे नव्या पिढीसाठी शिव-शाहू चरित्रांचा अमुल्य असा ठेवा उपलब्ध

कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना मोठा दिलासा; हेक्टरी २२ हजार रुपयांपर्यंत मदत देण्याचा राज्य सरकारचा मानस

मुंबई: गेल्या काही दिवसांत झालेल्या अवेळी पाऊस आणि हवामान बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू पिकाचे मोठे नुकसान

राज्यातील ८९ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर १७९८.७८ कोटी रुपयांचे वितरण

शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण मुंबई : नमो