Uday Samant : "ठाकरेंचा वचननामा म्हणजे केवळ आश्वासनांची खैरात!" मंत्री उदय सामंतांचा टोला

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी घोषणांची चढाओढ सुरू झाली आहे. मात्र, ठाकरे गटाच्या नव्या वचननाम्यावर टीका करताना उदय सामंत यांनी 'जुन्या आश्वासनांचे काय झाले?' असा परखड सवाल उपस्थित करून नव्या राजकीय वादाला तोंड फोडले आहे.



मुंबईकरांची २५ वर्षे वाया गेली?


गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर ठाकरे गटाची एकहाती सत्ता आहे. तरीही मुंबईकरांना हक्काची घरे आणि मूलभूत नागरी सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला. "आता दोन्ही ठाकरे एकत्र आले असून त्यांनी नवीन वचननामा जाहीर केला आहे, मात्र हादेखील केवळ कागदावरच राहील," असा अविश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईचा कायापालट करायचा असेल, तर महायुतीचा महापौर बसवणे हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.


"महापौर मराठीच होणार" 


मराठी माणसाला मुंबईत पुन्हा सन्मानाने स्थान मिळवून देण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे सामंत म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या "मुंबईचा महापौर मराठीच होईल" या घोषणेचे त्यांनी स्वागत केले. राज ठाकरे यांनीही मराठी महापौराची मागणी केल्यास त्यांना शुभेच्छा आहेत, मात्र ही जबाबदारी केवळ महायुतीचे नगरसेवक आणि महापौरच समर्थपणे पेलू शकतात, असे मत त्यांनी मांडले.


राज ठाकरेंच्या 'खंजीर' प्रकरणावर भाष्य


यावेळी उदय सामंत यांनी जुन्या राजकीय घडामोडींची आठवण करून देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. "आम्ही पूर्वीच भविष्यवाणी केली होती की उद्धव ठाकरे हे मनसेला केवळ ५०-५५ जागा देऊन राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसतील आणि प्रत्यक्षात तसेच घडले," असे ते म्हणाले. या दगाफटक्यामुळे राज ठाकरेंच्या मनात आजही वेदना असतील, पण त्या ते उघडपणे बोलू शकत नाहीत, असे सूचक विधानही त्यांनी केले.

Comments
Add Comment

बिनविरोध नसला तरी सुनेत्राताईंना विक्रमी विजय मिळवा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारामतीकरांना आवाहन

बारामती: महाराष्ट्राच्या जडणघडणीत माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

नागपूरकरांवर पाणीसंकट; सलग २ दिवस या भागात राहणार पाणी पुरवठा बंद

नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन नागपूर : नागपूर शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Baramati By Election : सुनेत्रा ताईंचा फोन आला अन्...बारामती पोटनिवडणुकीबाबत लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय

बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही, याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू

Akola Crime News : अकोल्यात ‘धुरंधर’ (Dhurandhar 2 ) स्टाईल गुंडगिरी; एकेमकांवर सपासप वार; पोलिसांनी काढली धिंड

अकोला ( Akola Crime News ) : अकोला शहरातील कौलखेड परिसरात ‘धुरंधर’ ( Dhurandhar 2 ) चित्रपट बघून गुंडगिरी करणाऱ्या पाच तरुणांना

Congress: काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार जाहीर

मुंबई: अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अखेर राजकीय