Uday Samant : "ठाकरेंचा वचननामा म्हणजे केवळ आश्वासनांची खैरात!" मंत्री उदय सामंतांचा टोला

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी घोषणांची चढाओढ सुरू झाली आहे. मात्र, ठाकरे गटाच्या नव्या वचननाम्यावर टीका करताना उदय सामंत यांनी 'जुन्या आश्वासनांचे काय झाले?' असा परखड सवाल उपस्थित करून नव्या राजकीय वादाला तोंड फोडले आहे.



मुंबईकरांची २५ वर्षे वाया गेली?


गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर ठाकरे गटाची एकहाती सत्ता आहे. तरीही मुंबईकरांना हक्काची घरे आणि मूलभूत नागरी सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला. "आता दोन्ही ठाकरे एकत्र आले असून त्यांनी नवीन वचननामा जाहीर केला आहे, मात्र हादेखील केवळ कागदावरच राहील," असा अविश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईचा कायापालट करायचा असेल, तर महायुतीचा महापौर बसवणे हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.


"महापौर मराठीच होणार" 


मराठी माणसाला मुंबईत पुन्हा सन्मानाने स्थान मिळवून देण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे सामंत म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या "मुंबईचा महापौर मराठीच होईल" या घोषणेचे त्यांनी स्वागत केले. राज ठाकरे यांनीही मराठी महापौराची मागणी केल्यास त्यांना शुभेच्छा आहेत, मात्र ही जबाबदारी केवळ महायुतीचे नगरसेवक आणि महापौरच समर्थपणे पेलू शकतात, असे मत त्यांनी मांडले.


राज ठाकरेंच्या 'खंजीर' प्रकरणावर भाष्य


यावेळी उदय सामंत यांनी जुन्या राजकीय घडामोडींची आठवण करून देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. "आम्ही पूर्वीच भविष्यवाणी केली होती की उद्धव ठाकरे हे मनसेला केवळ ५०-५५ जागा देऊन राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसतील आणि प्रत्यक्षात तसेच घडले," असे ते म्हणाले. या दगाफटक्यामुळे राज ठाकरेंच्या मनात आजही वेदना असतील, पण त्या ते उघडपणे बोलू शकत नाहीत, असे सूचक विधानही त्यांनी केले.

Comments
Add Comment

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर धावत्या खाजगी बसला भीषण आग

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांचे आणि आगीच्या घटनांचे सत्र थांबता थांबत नाहीये. आज पुन्हा एकदा

भटक्या कुत्र्यांचा हैदोस; पुण्यात पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे ४० जण जखमी

पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः हैदोस माजवत अनेक जणांना चावा घेतला आहे. या

उसतोड पूर्ण झाली आणि घरी परतताना रस्त्यातच परिवाराचा अपघात ; काळीज पिळवटणारी घटना

महाराष्ट्रात गेल्या काही महीन्यांपासून वाहनांच्या अपघातीच्या घटना होत असल्याच पहायला मिळत आहेत. तसंच एका

माणगावात मोफत दिव्यांग शिबिराचे आयोजन

२०० दिव्यांगांना आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय मोफत. आयोजकांची माणगाव मध्ये पत्रकार परिषदेतून माहिती. माणगाव :

साडीच्या ऑफरमुळे महिलांची चेंगराचेंगरी , ३ महिला बेशुद्ध

छत्रपती संभजीनगर : सध्या छत्रपती संभजीनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एक रीलस्टार ची रील पाहून महिलांनी

१५ ते २५ जानेवारीदरम्यान पुणे रेल्वे प्रवासात बदल, कोणत्या गाड्या रद्द? जाणून घ्या

पुणे : रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे रेल्वे विभागाकडून दौंड–मनमाड