संत ज्ञानेश्वर

 डॉ. देवीदास पोटे


संत ज्ञानेश्वरांचा हा अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे. अवघाची संसार म्हणजे सारे विश्व मी सुखमय करीन आणि सगळीकडे आनंदाचा वर्षाव करीन असे त्यांनी म्हटले आहे. हा आनंद प्रापंचिक वा संसारी लोकांसारखा नैमित्तिक व तत्कालिक स्वरूपाचा नाही. या आनंदाची जातकुळी विशुद्ध आणि नितळ स्वरूपाची आहे. हा आनंद मुळातच निरामय असतो. त्याला दुःखाचा कुठलाही संदर्भ नसतो. दुःखाचा अभाव हे या आनंदाचे स्वरूप नसते. या अभंगात संत ज्ञानेश्वर म्हणतात 'अवघा संसार म्हणजे सारे जग मी सुखमय करीन तिन्ही लोक आनंदाच्या लहरींनी भरून टाकीन.


खांद्यावर पताका घेऊन मी पंढरपूरला जाईन आणि आपल्या माहेरच्या आप्तांना भेटेन त्यामुळे पूर्वपुण्याईचे फळ मला मिळेल. विठुरायाची गळाभेट झाल्यावर मी त्याचाच होईन. मी विठ्ठलाचा झालो, की सर्व जग आनंदमय झाले हे सत्य प्रत्यक्षात येईल. कारण सर्व सुखाचा आणि आनंदमय क्षणांचा ठेवा विठुरायाच्या चरणाशी सामावलेला आहे.'


ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्त्वाला प्रेम, करुणा या गुणांची रेशमी किनार आहे. सर्व जग सुखी व्हावे अशी त्यांनी विश्वात्मक देवाकडे प्रार्थना केली आहे. ते सर्वांची काळजी वाहतात म्हणूनच ज्ञानेश्वर ही माउली. ज्ञानसंपन्न, भक्तिसंपन्न तरीही अतिशय लीन 'माउली' या शब्दाचे सर्व सार ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटले आहे. अवघा संसार म्हणजे चराचर विश्व आनंदमय करण्याचा संकल्प हे संतपणाचे लक्षण आहे. ज्ञानदेव हे भक्त. विठ्ठल ही माउली. पंढरपूर हे माहेर. विठ्ठलाचे भाक्तिप्रेम हे आनंदाचे निधान. मग अवघे चराचर आनंदमय लहरींनी भरून जाणार यात काय संदेह ? 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति' हे ब्रीद ज्ञानदेवांनी आपल्या अंगभूत समर्पणाने आणि सहजपणाने सिद्ध केले आहे.


अवघाचि संसार सुखाचा करीन ।
अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्हीं लोक ॥१॥
जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥
सर्व सुकृताचें फळ मी लाहीन । क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥
बापरखुमादेवीवरु विठ्ठलेंसी भेटी । आपुले संवसाटी करुनि ठेला ॥४॥

 

 
Comments
Add Comment

ठरलं तर ! इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात होणार 'या' महाराजांचे कीर्तन

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार

श्रद्धा की अंधश्रद्धा?

आत्मज्ञान : प्राची परचुरे-वैद्य मानवी जीवनाच्या घडणीत ‘श्रद्धा’ हा घटक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

आत्मतेजाचा निनाद अंतरी सद्गुरूंचा नाद

ऋतुराज : ऋतुजा केळकर “वाऱ्याच्या लयीसंगे विवेक जागतो... स्मरणातल्या सुरांनी मन शुद्ध होतं... सद्गुरूंच्या कृपेने

मनुष्य जन्म

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै आपण सध्या प्रबोधनासाठी घेतलेला विषय म्हटला तर अत्यंत कठीण आहे. म्हटले तर खूप

ज्ञानाचा सोपान

भारतीय संत : डॉ. अनुराधा कुलकर्णी निवृत्तिनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांच्या नावाची संगती

Hanuman Jayanti 2026 Wishes : हनुमान जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा हे भक्तिपर संदेश

मुंबई : हनुमान यांची जयंती म्हणजे भक्ती, शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव. या पवित्र दिवशी अनेकजण उपवास, पूजा आणि