संत ज्ञानेश्वर

 डॉ. देवीदास पोटे


संत ज्ञानेश्वरांचा हा अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे. अवघाची संसार म्हणजे सारे विश्व मी सुखमय करीन आणि सगळीकडे आनंदाचा वर्षाव करीन असे त्यांनी म्हटले आहे. हा आनंद प्रापंचिक वा संसारी लोकांसारखा नैमित्तिक व तत्कालिक स्वरूपाचा नाही. या आनंदाची जातकुळी विशुद्ध आणि नितळ स्वरूपाची आहे. हा आनंद मुळातच निरामय असतो. त्याला दुःखाचा कुठलाही संदर्भ नसतो. दुःखाचा अभाव हे या आनंदाचे स्वरूप नसते. या अभंगात संत ज्ञानेश्वर म्हणतात 'अवघा संसार म्हणजे सारे जग मी सुखमय करीन तिन्ही लोक आनंदाच्या लहरींनी भरून टाकीन.


खांद्यावर पताका घेऊन मी पंढरपूरला जाईन आणि आपल्या माहेरच्या आप्तांना भेटेन त्यामुळे पूर्वपुण्याईचे फळ मला मिळेल. विठुरायाची गळाभेट झाल्यावर मी त्याचाच होईन. मी विठ्ठलाचा झालो, की सर्व जग आनंदमय झाले हे सत्य प्रत्यक्षात येईल. कारण सर्व सुखाचा आणि आनंदमय क्षणांचा ठेवा विठुरायाच्या चरणाशी सामावलेला आहे.'


ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्त्वाला प्रेम, करुणा या गुणांची रेशमी किनार आहे. सर्व जग सुखी व्हावे अशी त्यांनी विश्वात्मक देवाकडे प्रार्थना केली आहे. ते सर्वांची काळजी वाहतात म्हणूनच ज्ञानेश्वर ही माउली. ज्ञानसंपन्न, भक्तिसंपन्न तरीही अतिशय लीन 'माउली' या शब्दाचे सर्व सार ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटले आहे. अवघा संसार म्हणजे चराचर विश्व आनंदमय करण्याचा संकल्प हे संतपणाचे लक्षण आहे. ज्ञानदेव हे भक्त. विठ्ठल ही माउली. पंढरपूर हे माहेर. विठ्ठलाचे भाक्तिप्रेम हे आनंदाचे निधान. मग अवघे चराचर आनंदमय लहरींनी भरून जाणार यात काय संदेह ? 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति' हे ब्रीद ज्ञानदेवांनी आपल्या अंगभूत समर्पणाने आणि सहजपणाने सिद्ध केले आहे.


अवघाचि संसार सुखाचा करीन ।
अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्हीं लोक ॥१॥
जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥
सर्व सुकृताचें फळ मी लाहीन । क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥
बापरखुमादेवीवरु विठ्ठलेंसी भेटी । आपुले संवसाटी करुनि ठेला ॥४॥

 

 
Comments
Add Comment

Babulnath Temple : मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी!

मुंबई : पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी (३ ऑगस्ट २०२६) संपूर्ण मुंबई शहर शिवभक्तीत चिंब भिजल्याचे

कर्म हेच ब्रह्मदेव

अंधारातून प्रकाशाकडे म्हणजेच अज्ञानातून ज्ञानाकडे या विषयाअंतर्गत आपण संचित प्रारब्ध ह्या संकल्पना समजावून

दशदिक्षु स्थितं दैवं, दशशक्तिसमन्वितम्

प्रभाती सूर नभी रंगती दशदिशा भूपाळी म्हणती पानोपानी अमृत शिंपित उषा हासरी हसते धुंदीत जागी होऊन फुले

नको देवराया अंत आता पाहू । प्राण हा सर्वथा जाऊ पाहे ।।

कान्हो, ते तुझ्यासाठी केलेले दागिने काय पेटीत ठेवण्यासाठी केले आहेत? जरा अंगावर घाल, बिदरचे सरदार येणार आहेत आज

आत्मपरीक्षण

आत्मज्ञान - प्राची परचुरे-वैद्य मानवी जीवनातील सर्वांत गुंतागुंतीचा शोध कोणता, असा प्रश्न विचारला तर त्याचे

एतेषु रूपेषु लक्ष्मीः प्रकट्या

ऋतुराज-ऋतुराज केळकर   ‘घाव बसलं घावावर सोसायला... झुंझायाला... अंगी बळ येऊ दे... आभाळागत माया तुझी आम्हावर राहू