संत ज्ञानेश्वर

 डॉ. देवीदास पोटे


संत ज्ञानेश्वरांचा हा अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे. अवघाची संसार म्हणजे सारे विश्व मी सुखमय करीन आणि सगळीकडे आनंदाचा वर्षाव करीन असे त्यांनी म्हटले आहे. हा आनंद प्रापंचिक वा संसारी लोकांसारखा नैमित्तिक व तत्कालिक स्वरूपाचा नाही. या आनंदाची जातकुळी विशुद्ध आणि नितळ स्वरूपाची आहे. हा आनंद मुळातच निरामय असतो. त्याला दुःखाचा कुठलाही संदर्भ नसतो. दुःखाचा अभाव हे या आनंदाचे स्वरूप नसते. या अभंगात संत ज्ञानेश्वर म्हणतात 'अवघा संसार म्हणजे सारे जग मी सुखमय करीन तिन्ही लोक आनंदाच्या लहरींनी भरून टाकीन.


खांद्यावर पताका घेऊन मी पंढरपूरला जाईन आणि आपल्या माहेरच्या आप्तांना भेटेन त्यामुळे पूर्वपुण्याईचे फळ मला मिळेल. विठुरायाची गळाभेट झाल्यावर मी त्याचाच होईन. मी विठ्ठलाचा झालो, की सर्व जग आनंदमय झाले हे सत्य प्रत्यक्षात येईल. कारण सर्व सुखाचा आणि आनंदमय क्षणांचा ठेवा विठुरायाच्या चरणाशी सामावलेला आहे.'


ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्त्वाला प्रेम, करुणा या गुणांची रेशमी किनार आहे. सर्व जग सुखी व्हावे अशी त्यांनी विश्वात्मक देवाकडे प्रार्थना केली आहे. ते सर्वांची काळजी वाहतात म्हणूनच ज्ञानेश्वर ही माउली. ज्ञानसंपन्न, भक्तिसंपन्न तरीही अतिशय लीन 'माउली' या शब्दाचे सर्व सार ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटले आहे. अवघा संसार म्हणजे चराचर विश्व आनंदमय करण्याचा संकल्प हे संतपणाचे लक्षण आहे. ज्ञानदेव हे भक्त. विठ्ठल ही माउली. पंढरपूर हे माहेर. विठ्ठलाचे भाक्तिप्रेम हे आनंदाचे निधान. मग अवघे चराचर आनंदमय लहरींनी भरून जाणार यात काय संदेह ? 'जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति' हे ब्रीद ज्ञानदेवांनी आपल्या अंगभूत समर्पणाने आणि सहजपणाने सिद्ध केले आहे.


अवघाचि संसार सुखाचा करीन ।
अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्हीं लोक ॥१॥
जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥
सर्व सुकृताचें फळ मी लाहीन । क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥
बापरखुमादेवीवरु विठ्ठलेंसी भेटी । आपुले संवसाटी करुनि ठेला ॥४॥

 

 
Comments
Add Comment

समर्थ रामदास

डॉ. देवीदास पोटे जगी सर्वसुखी असा कोण आहे ?। विचारी मना तूचि शोधूनि पाहे ॥ 'मनाचे श्लोक' हे समर्थाचे अतिशय

संसारी असावे सावध

जीवन संगीत,सद्गुरू वामनराव पै सर्ग, नियम व आपले कर्म यांचा आपल्या जीवनातील घडामोडींशी, आपण भोगणाऱ्या सुख

नरदेहाचे महत्त्व

परमेश्वराने सारासारविवेकसंपन्न, सर्वोत्कृष्ट, दुर्लभ असा जो नरदेह दिला त्यात, प्रत्येक मानवाने स्वस्वरूपाचे

शंभरी ऋतुराजाची

ऋतुराज,ऋतुजा केळकर मी एक ‘साधी स्त्री’ जीवनाच्या आकडेमोडीत हरवलेली. संसार, लग्न, मुलं या साऱ्या घटना जशा एका

माणूस आणि मन

मर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक हे खूप प्रसिद्ध आहेत. मनाचे श्लोक माहीत नाहीत असा माणूस निराळाच. त्यांच्या

महर्षी याज्ञवल्क्य

कदा जनकराजाने आपल्या दरबारात शास्त्रचर्चेसाठी विद्वानांची सभा आयोजित केली होती. त्यावेळी त्याने घोषणा केली की