एमपीएससीचा लाखो उमेदवारांना दिलासा

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी पात्र उमेदवारांना एक वर्षाची वयोमर्यादेतील शिथिलता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यामुळे केवळ वयोमर्यादा ओलांडल्यामुळे परीक्षेपासून वंचित राहिलेल्या अनेक उमेदवारांना पुन्हा एकदा स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.


राज्यातील हजारो तरुण गेल्या अनेक वर्षांपासून एमपीएससी परीक्षांची तयारी करत आहेत. मात्र कोरोना काळ, प्रशासकीय अडचणी आणि विविध कारणांमुळे परीक्षा वेळेवर न झाल्याने अनेक उमेदवारांचे वय कमाल मर्यादेपेक्षा अधिक झाले होते. यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना उमेदवारांमध्ये होती. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संघटनांनी वयोमर्यादा वाढवून देण्याची मागणी केली होती. अखेर या मागणीला यश आले आहे. आयोगाच्या निर्णयानुसार ही वयोमर्यादेतील शिथिलता केवळ २०२४ मधील गट-ब आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षांसाठी लागू असणार आहे.

Comments
Add Comment

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर

मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी