राज्यात ढगाळ हवामानाचा मुक्काम

आंबा-काजू उत्पादक शेतकरी संकटात?


मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्यानंतर आता हवामानात अचानक मोठा बदल झाला आहे. राज्याच्या अनेक भागांत थंडीचा कडाका ओसरला असून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या हवामान बदलाचा सर्वाधिक फटका कोकण आणि मध्य महाराष्ट्राला बसला असून, ऐन भरात आलेल्या आंबा आणि काजूच्या हंगामावर संकटाचे सावट निर्माण झाले आहे.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील किमान तापमानात आज मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीसह अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. जरी पावसाची शक्यता कमी असली, तरी हे ढगाळ हवामान पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. यामुळे जानेवारीतील गारवा अचानक गायब झाला असून हवेत उकाडा जाणवू लागला आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवार सायंकाळपासून वातावरणात वेगाने बदल झाले आहेत. आधी दाट धुके आणि आता ढगाळ हवामानामुळे आंबा व काजू बागायतदार चिंतेत पडले आहेत. गेल्या ४-५ वर्षांनंतर यंदा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये चांगली थंडी पडल्याने आंबा आणि काजूला विक्रमी मोहोर आला आहे. किनारपट्टी भागात तर पानांपेक्षा मोहोरच जास्त अशी स्थिती आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून वाढलेले धुके आणि आताचे ढगाळ वातावरण यामुळे 'टी मॉस्किटो' (तुडतुडे) आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहाटेच्या वेळी झाडांवरून पावसासारखे पाणी पडत असल्याने मोहोराची गळती होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.


यंदा चांगल्या थंडीमुळे आंबा, काजूला उत्तम मोहोर आला असून, काही भागांत फळधारणादेखील झाली आहे. दमट वातावरणामुळे किडरोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बागांचे निरीक्षण करून विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशक, बुरशीनाशकांची फवारणी करावी. इतर व्यवस्थापनदेखील कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार करावे.


- डॉ. यशवंत मुठाळ, तांत्रिक अधिकारी, संशोधन केंद्र, मुळदे

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य