राज्यात ढगाळ हवामानाचा मुक्काम

आंबा-काजू उत्पादक शेतकरी संकटात?


मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्यानंतर आता हवामानात अचानक मोठा बदल झाला आहे. राज्याच्या अनेक भागांत थंडीचा कडाका ओसरला असून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या हवामान बदलाचा सर्वाधिक फटका कोकण आणि मध्य महाराष्ट्राला बसला असून, ऐन भरात आलेल्या आंबा आणि काजूच्या हंगामावर संकटाचे सावट निर्माण झाले आहे.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील किमान तापमानात आज मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीसह अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. जरी पावसाची शक्यता कमी असली, तरी हे ढगाळ हवामान पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. यामुळे जानेवारीतील गारवा अचानक गायब झाला असून हवेत उकाडा जाणवू लागला आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवार सायंकाळपासून वातावरणात वेगाने बदल झाले आहेत. आधी दाट धुके आणि आता ढगाळ हवामानामुळे आंबा व काजू बागायतदार चिंतेत पडले आहेत. गेल्या ४-५ वर्षांनंतर यंदा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये चांगली थंडी पडल्याने आंबा आणि काजूला विक्रमी मोहोर आला आहे. किनारपट्टी भागात तर पानांपेक्षा मोहोरच जास्त अशी स्थिती आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून वाढलेले धुके आणि आताचे ढगाळ वातावरण यामुळे 'टी मॉस्किटो' (तुडतुडे) आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहाटेच्या वेळी झाडांवरून पावसासारखे पाणी पडत असल्याने मोहोराची गळती होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.


यंदा चांगल्या थंडीमुळे आंबा, काजूला उत्तम मोहोर आला असून, काही भागांत फळधारणादेखील झाली आहे. दमट वातावरणामुळे किडरोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बागांचे निरीक्षण करून विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशक, बुरशीनाशकांची फवारणी करावी. इतर व्यवस्थापनदेखील कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार करावे.


- डॉ. यशवंत मुठाळ, तांत्रिक अधिकारी, संशोधन केंद्र, मुळदे

Comments
Add Comment

जन्म नोंदणी आणि प्रमाणपत्र विषयक कार्यवाहीचा महापौर घेणार दर महिन्याला आढावा

मुंबई: जन्म नोंदणी करून त्याचे प्रमाणपत्र देणे, हा फक्त शासकीय दस्तावेज देण्यापुरता मर्यादित विषय नसून त्याचाच

उपमहापौरांची कुपर रुग्णालयाला भेट; स्वच्छता आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर दिले कारवाईचे आदेश

मुंबई: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अवघ्या पाच दिवसांपूर्वी विलेपार्ले येथील डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय येथे

विजय सूर्यवंशी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी

मुंबई : राज्य सरकारने बुधवारी प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल केले असून, तीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,