आसाममध्ये भल्या पहाटे भूकंप! नागरिकांची उडाली धावपळ; वाचा सविस्तर

गुवाहाटी : आसाममधून एक मोठी बातमी समोर आली आहे. आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.१ इतकी नोंदवण्यात आली असून, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र अचानक बसलेल्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अनेकांची झोपेतूनच धावपळ उडाली.


राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र २६.३७ अंश उत्तर अक्षांश आणि ९२.२९ अंश पूर्व रेखांशावर होते. हा भूकंप जमिनीखाली सुमारे ५० किलोमीटर खोलीवर झाला. पहाटेच्या शांततेत जोरदार धक्का बसल्याने अनेक नागरिक घाबरून घराबाहेर पडले आहेत.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे जीवित किंवा मोठ्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तात्काळ वृत्त नाही. मात्र मध्य आसामच्या काही भागांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाचे हादरे नागरिकांना जाणवले. भूकंपाच्या वेळी अनेक नागरिक झोपेत असल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.


दरम्यान, आसामसह मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि ईशान्य भारतातील इतर काही भागांमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती आहे. मात्र हे हादरे तीव्र नसल्याने फारसा धोका निर्माण झाला नाही. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

World Emoji Day : तुमचा आवडता इमोजी तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या!

WhatsApp, Instagram, Facebook किंवा DM... https://prahaar.in/2026/07/16/never-practice-these-8-habits-after-waking-up-in-the-morning-they-could-affect-your-health/ कुठेही Chat करताना आपण वापरत असलेले इमोजी आता

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती