आसाममध्ये भल्या पहाटे भूकंप! नागरिकांची उडाली धावपळ; वाचा सविस्तर

गुवाहाटी : आसाममधून एक मोठी बातमी समोर आली आहे. आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.१ इतकी नोंदवण्यात आली असून, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र अचानक बसलेल्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अनेकांची झोपेतूनच धावपळ उडाली.


राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र २६.३७ अंश उत्तर अक्षांश आणि ९२.२९ अंश पूर्व रेखांशावर होते. हा भूकंप जमिनीखाली सुमारे ५० किलोमीटर खोलीवर झाला. पहाटेच्या शांततेत जोरदार धक्का बसल्याने अनेक नागरिक घाबरून घराबाहेर पडले आहेत.


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे जीवित किंवा मोठ्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तात्काळ वृत्त नाही. मात्र मध्य आसामच्या काही भागांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाचे हादरे नागरिकांना जाणवले. भूकंपाच्या वेळी अनेक नागरिक झोपेत असल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.


दरम्यान, आसामसह मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि ईशान्य भारतातील इतर काही भागांमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती आहे. मात्र हे हादरे तीव्र नसल्याने फारसा धोका निर्माण झाला नाही. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या