गरजू रुग्णांना उपचार नाकारल्यास कारवाई

मुंबई :राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत, दर्जेदार आणि त्रासमुक्त उपचार मिळणे हा त्यांचा हक्क आहे. यामध्ये कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. तसेच रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिल्यास कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' आणि 'महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने'शी संबंधित कोणत्याही खाजगी किंवा सरकारी रुग्णालयाने कोणत्याही तांत्रिक कारणास्तव रुग्णाला उपचार नाकारू नयेत, असे आदेश त्यांनी दिले.


आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे आयोजित एका विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अण्णासाहेब चव्हाण, ठाणे जिल्हा परिमंडळाचे उपसंचालक डॉ. अशोक नंदापूरकर आणि विविध रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


मंत्री आबिटकर यांनी बैठकीत स्पष्ट केले की, अनेकदा मूळ रेशन कार्ड नसल्यामुळे किंवा इतर किरकोळ कागदपत्रांच्या अभावामुळे रुग्णालये रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतात. "मूळ रेशन कार्ड नसेल तर डिजिटल रेशन कार्ड पडताळणीचा वापर करा, पण रुग्णाला उपचारांपासून वंचित ठेवू नका," असे त्यांनी ठणकावून सांगितले.


या निर्णयामुळे राज्यातील लाखो गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह

Air quality monitoring : मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई  : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

मुंबईत मोहरम मिरवणुकीत १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त ! ३००० हजार लोकांचे जीव होते धोक्यात ?

Mumbai: मुंबईच्या भायखळा (Byculla) परिसर

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मध्ये रेल्वे मार्गावर १२ नवीन एसी लोकल धावणार; वेळपत्रक आले समोर

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान एसी लोकलच्या

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे