गरजू रुग्णांना उपचार नाकारल्यास कारवाई

मुंबई :राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत, दर्जेदार आणि त्रासमुक्त उपचार मिळणे हा त्यांचा हक्क आहे. यामध्ये कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. तसेच रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिल्यास कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' आणि 'महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने'शी संबंधित कोणत्याही खाजगी किंवा सरकारी रुग्णालयाने कोणत्याही तांत्रिक कारणास्तव रुग्णाला उपचार नाकारू नयेत, असे आदेश त्यांनी दिले.


आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे आयोजित एका विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अण्णासाहेब चव्हाण, ठाणे जिल्हा परिमंडळाचे उपसंचालक डॉ. अशोक नंदापूरकर आणि विविध रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


मंत्री आबिटकर यांनी बैठकीत स्पष्ट केले की, अनेकदा मूळ रेशन कार्ड नसल्यामुळे किंवा इतर किरकोळ कागदपत्रांच्या अभावामुळे रुग्णालये रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतात. "मूळ रेशन कार्ड नसेल तर डिजिटल रेशन कार्ड पडताळणीचा वापर करा, पण रुग्णाला उपचारांपासून वंचित ठेवू नका," असे त्यांनी ठणकावून सांगितले.


या निर्णयामुळे राज्यातील लाखो गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

BMC News : जन्म व मृत्यूशी संबंधित विविध अर्जांची नोंद आता स्वतंत्र संगणकात; जुने जन्म / मृत्यू प्रमाणपत्र नवीन क्युआर कोडयुक्त प्रमाणपत्र

स्वतंत्र खिडकीद्वारे स्वीकारणार अर्ज https://prahaar.in/2026/08/06/residents-of-worli-prabhadevi-and-lower-parel-will-face-garbage-related-issues-for-3-to-4-days/ मुंबई (विशेष प्रतिनिधी) :

Water Supply Cut News : वांद्रे पूर्व ते अंधेरी पूर्व भागांत येत्या मंगळवार, बुधवार पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पूर्व ते वांद्रे पूर्व के दक्षिण आणि एच पूर्व विभागातील पाणीपुरवठा

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी

Mohan Bhagwat : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा 'जेन-झी'शी संवाद

Mumbai : शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक गोष्टी करता येऊ शकतात. मात्र हे सर्व करताना समाजात फूट पाडण्यासाठी नव्हे, तर