‘एक्स’वर महिलांचे आक्षेपार्ह फोटो, 'एआय'च्या गैरवापराबद्दल खासदारांचं मोदी सरकारला पत्र!


नवी दिल्ली : शिवसेना (उबाठा)च्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी नुकतेच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट खात्यांचा वापर करून महिलांची आक्षेपार्ह छायाचित्रे पोस्ट करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांच्या कथित गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली. अशा प्रकारच्या कृतींमुळे महिलांच्या गोपनीयतेचे गंभीर उल्लंघन होते. त्यामुळे केंद्र सरकारने महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.


प्रियांका चतुर्वेदी यांनी पत्रात लिहिले आहे की, सोशल मीडियावर, विशेषतः 'एक्स'वर, एआय ग्रोकचा गैरवापर केला जात आहे. यामध्ये पुरुष बनावट खात्यांचा वापर करून महिलांचे फोटो पोस्ट करत आहेत. ग्रोकला चुकीच्या सूचना करून आक्षेपार्ह फोटो तयार करत आहेत. हे केवळ बनावट खात्यांद्वारे फोटो शेअर करण्यापुरते मर्यादित नाही, तर ज्या महिला स्वतःचे फोटो पोस्ट करतात त्यांनाही लक्ष्य केले जात आहे. हे अस्वीकार्य आहे आणि एआयचा हा घोर गैरवापर आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. याहून वाईट गोष्ट म्हणजे, ग्रोक अशा विनंत्या मान्य करून या वर्तनाला प्रोत्साहन देत आहे, असे त्या म्हणाल्या.


सदर प्रकार हा महिलांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. तसेच महिलांच्या फोटोचा अनधिकृत वापर केला जात आहे, जो केवळ अनैतिकच नाही, तर गुन्हेगारी देखील आहे, असे त्यांनी म्हटले. प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'विरुद्ध निर्णायक कारवाई करण्याची आणि महिलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी एआय-आधारित साधनांमध्ये सुरक्षा उपाय लागू करण्याची विनंती केली आहे.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी