तिरुपती गोविंदराजस्वामी मंदिरात मद्यपीचा धिंगाणा

तिरुपती : मद्याच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने तिरुपतीमधील श्री गोविंदराजस्वामी मंदिरात धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांना चुकवून मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर ही व्यक्ती मंदिराच्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत असताना दक्षता कर्मचाऱ्यांच्या वेळीच लक्षात आले. तिरुपती संकुलात प्रवेश केल्यानंतर मद्यपी गोपुरमवर चढून कळसापर्यंत गेला. हे पाहून मंदिरातील अधिकारी आणि कर्मचारी गोळा झाले.


कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मंदिर प्रशासनाने तत्काळ पोलीस आणि अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. मद्यपीने गोंधळ घातल्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.


मंदिरातील दक्षता अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यपीचे नाव कुट्टाडी तिरुपती (४५) असल्याचे सांगितले जाते. तो तेलंगणाच्या निजामाबाद जिल्ह्यातील कुर्मवाडा येथील पेद्दामल्ला रेड्डी कॉलनीतील रहिवासी आहे. इतर भाविकांप्रमाणेच त्यानेही मंदिरात प्रवेश केला होता. यानंतर तंबूच्या खांबांचा वापर करून नदीमी गोपुरमवर चढला.


गोपुरमच्या कळसावर चढल्यानंतर मद्यपीने मद्याची बाटली मागितली. मद्याची बाटली आणून दिली तरच खाली उतरेन, अशी अट त्याने ठेवली होती. मंदिरातील दक्षता अधिकाऱ्यांनी त्याची मागणी मान्य केल्यानंतर तो स्वतःहून सुरक्षितपणे खाली उतरला.

Comments
Add Comment

Bhopal CCTV Footage : AIIMS मधील 'तो' थरार! लिफ्टमध्ये एकट्या महिलेला गाठले अन्... पाहा सीसीटीव्हीमधील काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

भोपाळ : देशातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या 'एम्स' (AIIMS) रुग्णालयातून सुरक्षेला आव्हान देणारी एक अत्यंत गंभीर घटना

Fire At Warehouse : १५ तास उलटले तरी आग... ८ जणांचा होरपळून मृत्यू, तर २० जण अजूनही बेपत्ता

कोलकाता : देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना, कोलकात्याच्या आनंदपूर परिसरात सोमवारी पहाटे काळजाचा थरकाप

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट; ११ जवान जखमी

बिजापूर/रायपूर : रविवारी २५ जानेवारीला छत्तीसगडमधील बिजापूरच्या उसुर पोलीस स्टेशन परिसरात आयईडी स्फोट झाला. इथे

हिंदू समाजाला तीन मुले होण्यापासून कोणीही रोखलेलं नाही; डॉ. मोहन भागवत

मुझफ्फरपूर : मुझफ्फरपूर येथील सामाजिक समरसता चर्चासत्र बोलताना डॉ. मोहन भागवत म्हणाले की, भारतात विविधता आहे,

कर्तव्यपथावर 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर, प्रजासत्ताक दिनी दिसले देशाचे सामर्थ्य

नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत कर्तव्यपथावर संचलनाचे अर्थात

मोदी सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा

नवी दिल्ली : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा