समाजवादी पक्षात अबू आझमी यांनी निष्ठावंतांना डावलले

मुंबई : ३ जानेवारी २०२५ मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयाराम गयारामची चलती होती. समाजवादी पक्षात आयात केलेल्यांना उमेदवारी देत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले आहे. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबु आझमी यांनी राज्यात पार्टीला स्वत:ची जहागीर बनवले असून महानगरपालिका निवडणुकीत मनमानी पद्धतीने उमेदवारी वाटप केली आहे, असा गंभीर आरोप समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केला आहे. सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे.


आमदार रईस शेख यांनी राज्यात पार्टीमध्ये सुरू असलेल्या गोंधळाबाबत अखिलश यादव यांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये त्यांनी भिवंडीमध्ये माझ्यासोबत असलेल्या पार्टीच्या कार्यकर्त्यांना जाणूनबुजून उमेदवारी नाकारली गेली आहे. ज्या कार्यकर्त्यांनी २०१९ आणि २०२४ मध्ये पक्षाला भिवंडीमध्ये विजयी करण्यात भूमिका बजावली त्यांना या निवडणुकीत बाजूला करण्यात आले. अबु आझमी यांनी एककल्ली आणि मनमानी पद्धतीने उमेदवारी दिल्या आहेत, असा आमदार रईस शेख यांनी पत्रात आरोप केला आहे. मुंबईत माझ्याविरोधात पार्टीमध्ये अपप्रचार केला जात आहे. आयात उमेदवारांना पायघड्या घालण्यात येत आहेत. मी म्हणजे पार्टी... अशी प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांची वर्तणूक आहे. एनसीपी आणि शिवसेना फुटीच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्य उमेदवारांची मुंबईत यावेळी निर्णयक भूमिका असताना समाजवादी पार्टीमध्ये नेत्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न चालू आहेत. या सर्वांचा फटका यावेळी पार्टीला बसू शकतो, असा इशारा आमदार रईस शेख यांनी पत्रामध्ये दिला आहे.


२०१० मध्ये भिवंडी पूर्व विधानसभेला अबु आझमी यांच्या मुलगा फरहान आझमी याचा पराभव झाला होता. २०१९ मध्ये मला भिवंडी पूर्वमध्ये उमेदवारी दिली गेली, त्यावेळी १५०० मतांनी मी जिंकलो. पाच वर्षात आमदार म्हणून केलेल्या कामांमुळे २०२४ मध्ये मी ५२ हजार मतांनी मी निवडून आलो. भिवंडीत समाजवादी मुख्य भूमिकेत आहे.

Comments
Add Comment

Nashik : संतापजनक ! समाजकंटकांकडून एक एकर उभी कारल्याची बाग उद्ध्वस्त ! शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

Nashik : नाशिकच्या येवला तालुक्यातील धुळगाव येथे संतापजनक प्रकार समोर आला आहे. धुळगाव येथील एका कष्टकरी

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Nashik : कोथिंबिरीच्या जुडीला तब्बल २८५ रुपये; पालेभाज्यांचे भाव गगनाला

Nashik : पावसाने ओढ दिल्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली असून त्याचा थेट परिणाम पालेभाज्यांच्या दरावर झाला आहे. नाशिक

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक