Nashik : कोथिंबिरीच्या जुडीला तब्बल २८५ रुपये; पालेभाज्यांचे भाव गगनाला

Nashik : पावसाने ओढ दिल्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली असून त्याचा थेट परिणाम पालेभाज्यांच्या दरावर झाला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील (Nashik Agricultural Produce Market Committee) लिलावात कोथिंबिरीच्या (Coriander) एका जुडीला तब्बल २८५ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणातील कोथिंबीर आता महागडी ठरू लागली आहे. यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. जून महिना जवळपास कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात ३५६.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यात ११३.६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. १७ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९४.५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.( Nashik News )



कोथिंबिरीच्या जुडीला २८५ रुपयांचा उच्चांकी दर


मात्र, पावसाचे असमान वितरण आणि काही भागातील पावसाच्या ओढीमुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. परिणामी बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आणि दरात मोठी वाढ झाली. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील चार दिवसांपासून १४ जुलै रोजी कोथिंबिरीच्या जुडीला २०० रुपये, १५ जुलै रोजी २४८ रुपये, तर १७ जुलै रोजी २८५ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. सर्वसाधारणपणे कोथिंबिरीची विक्री ७० ते २८५ रुपये प्रति जुडी या दराने झाली. बाजार समितीतील व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, कोथिंबिरीला मिळालेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे. दरवाढीमुळे ग्राहकांना कोथिंबीर खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत असून, सर्वसामान्यांच्या जेवणाच्या ताटातून कोथिंबीर हद्दपार होण्याची वेळ आली आहे. ( Nashik News )



दुगारवाडी धबधबा अनिश्चित काळासाठी बंद


दरम्यान , दुसरीकडे दुगारवाडी धबधब्याविषयी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरती असलेला दुगारवाडी येथील धबधबा (Dugarwadi Waterfal) हा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असून त्याबाबतचा आदेश हा काढण्यात आला आहे, त्यामुळे पावसाळ्यामध्ये दुगारवाडीचा धबधबा हा आता अनिश्चित काळासाठी बंद झाला आहे.


दुगारवाडी धबधबा (Dugarwadi Waterfal) येथे फिरण्यासाठी आलेल्या नाशिक येथील २० वर्षीय अभिजीत नवनाथ पवार याचा खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. वनविभागाने तसेच जिल्हा प्रशासनाने यापूर्वी नागरिकांना पर्यटन स्थळावरती जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. पण तरी देखील नागरिकांकडून फारशी काळजी घेतली जात नसल्याने तसेच या दुर्घटनंतर वनविभागाने अतिशय कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला असून त्र्यंबकेश्वर परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी शुक्रवारी सकाळी एक आदेश प्रकाशित केला असून जोपर्यंत पुढील आदेश होत नाही तोपर्यंत दुगारवाडी येथील धबधब्यावरती जाण्यासाठी पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे.

Comments
Add Comment

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ahilyanagar : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीला अटक; दोन गावे कडकडीत बंद

Ahilyanagar ( राहुरी /आश्वी प्रतिनिधी ) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यात तुळापूर (Tulapur) येथील एक संतापजनक घटना