कमी खर्चात अधिक सुविधा ; MSRTC ची नवी पास योजना ?


मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन योजना काढली आहे. योजनेनुसार ई- बस सेवेचा वापर वाढवण्यासाठी नवीन मासिक आणि त्रेमासिक पास योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य हेतु असा आहे की दररोज एकाच मार्गवर नोकरी , व्यवसाय अथवा शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना कमी खर्चात अधिक सुविधा देणे हा आहे. या पास योजनेमुळे ई-बस सेवा अधिक किफायतशीर ठरणार असून प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत.


नवीन पास योजनेमुळे पैसे आणि वेळ दोन्ही वाचणार


एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की खासगी वाहनांचा वापर कमी करून जास्तीत जास्त प्रवाशांनी ई-बसमधून प्रवास करावा,यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. रोजच्या प्रवाशांना ई-बसकडे आकर्षित करणे हा या योजनेचा प्रमुख हेतू आहे.


सध्या MSRTC च्या ई-बस प्रकल्पांतर्गत ४४८ ई-बस कार्यरत असून शिवाई प्रकल्पामध्ये आणखी ५० ई-बस सेवा देत आहेत. येत्या काही महिन्यांत या बसची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा मानस असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे. त्यामुळे भविष्यात अधिक मार्गांवर ई-बस सेवा सुरू होणार आहे. या योजनेत मासिक आणि त्रैमासिक असे दोन प्रकारचे पास उपलब्ध आहेत. मासिक पासमध्ये ३० दिवसांचा प्रवास कालावधी असून केवळ २० दिवसांचे भाडे भरावे लागणार आहे. तर त्रैमासिक पासमध्ये ९० दिवसांचा कालावधी असून ६० दिवसांचे भाडे भरल्यास संपूर्ण ९० दिवस प्रवास करता येणार आहे.


मुंबई-ठाणे-अलिबाग प्रवाशांसाठी खुशखबर!


मुंबई ते ठाणे, अलिबाग यांसारख्या जवळच्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात दैनंदिन प्रवासी प्रवास करतात. या मार्गांवर आधीपासूनच ई-बस सेवा सुरू असल्यामुळे नवीन पास योजनेचा थेट फायदा या प्रवाशांना होणार आहे. प्रवास अधिक सोपा, सुरक्षित आणि स्वस्त होईल, असा विश्वास महामंडळाने व्यक्त केला आहे.


ही पास योजना मीटर आणि १२ मीटर ई-बस तसेच ई-शिवाई बस सेवेसाठी लागू असणार आहे. त्यामुळे नियमित ई-बस प्रवाशांना या योजनेचा मोठा दिलासा मिळणार आहे.




Comments
Add Comment

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा